शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखातिया  :  मागील पंधरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या नावावर वेळ मारुन नेण्याच्या धोरणामुळे कंटाळलेल्या बिरसी येथील १०६ प्रकल्पग्रस्तांनी कंटाळून अखेर मंगळवारी (दि. २२) बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील मोकळ्या जागेवर घराच्या बांधकामाचे भुमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता.गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. पण, या घरांची स्थितीसुद्धा आता बिकट झाली असून, ते केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे या प्रकल्पग्रस्तांना शासनाने घरे बांधण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून दिले नाहीत, तर ते कधी उपलब्ध करून देणार, याबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे जीवन जगायचे, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही  प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून विमानतळाच्या परिसरात टेंट उभारुन त्यात राहण्यास सुरुवात करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. 

सर्व लोकप्रतिनिधींची केवळ पोकळ आश्वासने - विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्यांना मागील पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे या दोघांवर आता आपला विश्वास राहिला नसल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तसेच यापुढची लढाई स्वत:च्या भरवशावर लढू, असे सांगितले. 

प्रकल्पग्रस्तांना प्लाॅट देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप आमचे पुनर्वसन झाले नाही. घरे बांधण्यासाठी जागा केव्हा उपलब्ध करून देणार, हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.- प्रकल्पग्रस्त

 

टॅग्स :Airportविमानतळ