शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरच केले घराच्या बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखातिया  :  मागील पंधरा वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या नावावर वेळ मारुन नेण्याच्या धोरणामुळे कंटाळलेल्या बिरसी येथील १०६ प्रकल्पग्रस्तांनी कंटाळून अखेर मंगळवारी (दि. २२) बिरसी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील मोकळ्या जागेवर घराच्या बांधकामाचे भुमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला होता.गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेली १०६ कुटुंब मागील पंधरा वर्षांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा जिल्हा प्रशासन व बिरसी विमानतळ प्राधिकरणाला अनेकदा निवेदन दिले. पण, त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आले नाही. परिणामी त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काचा निवारा हिरावल्याने मागील पंधरा वर्षांपासून झोपड्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. पण, या घरांची स्थितीसुद्धा आता बिकट झाली असून, ते केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर दुसरीकडे या प्रकल्पग्रस्तांना शासनाने घरे बांधण्यासाठी प्लाॅट उपलब्ध करून दिले नाहीत, तर ते कधी उपलब्ध करून देणार, याबाबत कुठलेच आश्वासन दिले नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे जीवन जगायचे, असा सवाल करीत प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी विमानतळाच्या प्रवेशव्दारासमोरील जागेवर घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयसुध्दा उपस्थित होते. मात्र, यानंतरही  प्रशासनातर्फे कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून विमानतळाच्या परिसरात टेंट उभारुन त्यात राहण्यास सुरुवात करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. 

सर्व लोकप्रतिनिधींची केवळ पोकळ आश्वासने - विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्यांना मागील पंधरा वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे या दोघांवर आता आपला विश्वास राहिला नसल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तसेच यापुढची लढाई स्वत:च्या भरवशावर लढू, असे सांगितले. 

प्रकल्पग्रस्तांना प्लाॅट देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्याप आमचे पुनर्वसन झाले नाही. घरे बांधण्यासाठी जागा केव्हा उपलब्ध करून देणार, हे अद्याप प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.- प्रकल्पग्रस्त

 

टॅग्स :Airportविमानतळ