शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भालेराव, शेंडे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनील भालेराव, काँग्रेसचे जिल्हा महासचिव विशाल शेंडे, माजी न.प.सभापती ...

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनील भालेराव, काँग्रेसचे जिल्हा महासचिव विशाल शेंडे, माजी न.प.सभापती गज्जू नागदेवे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह रविवारी (दि.२०) स्थानिक पीपी कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षात इनकमिंग आणि आऊट गोईंगचे सत्र सुरु झाले आहे. त्यातच रविवारी सुनील भालेराव, विशाल शेंडे, गज्जू नागदेवे, माजी नगराध्यक्ष रमेश ठाकरे, भाजप अनुसूचित जाती जिल्हा युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख वसंत गणवीर, डाॅ. राजेंद्र वैद्य, बशीरभाई कुरैशी,कबीर सुखदेवे, माजी सभापती विकास शेंडे, फैयाद पठान, मिलिंद नागदेवे, आकाश गडपायले, नैतराम गौतम, किशोर गजभिये, सुदर्शन वाहने, बेंजामिन लारेंस, नौशाद जाफरी, पास्टर महेंद्र शेंडे, धीरज रुपारेल, रामप्रसाद गौतम आदी कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या विकास कामांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, शहराध्यक्ष अशोक शहारे, विनोद हरिणखेडे, केतन तुरकर, रफीक खान आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच हा धक्का मानला जात आहे.

...........

जनसामान्यांपर्यंत पक्षाचे कार्य पोहचवा : प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य व कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. टीका करण्यापेक्षा आमचा प्रत्यक्ष काम करण्यावर विश्वास आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सदैव प्रयत्नरत आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत याची माहिती पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करावे. जनता जनार्धनच आपली खरी ताकद आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.