शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

८ कोटी रुपयांचा बेवारटोला प्रकल्प पोहोचला ३५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

........ धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे ...

........

धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी

तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांची निधीची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असून जवळपास २८ गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. टप्पा एकचे काम पूर्ण झाले असून टप्पा दोनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी महिनाभरापूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली हाेती. त्याला मंत्री जयंत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली होती.

.......

झाशीनगर उपसा सिंचन केव्हा होणार पूर्ण

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले; मात्र उर्वरित ३० टक्के रखडले असल्याने ३०४५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दोनदा भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते; मात्र बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन आणि मोबदला देण्यावरुन या प्रकल्पाचे काम सुद्धा रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता परिसरातील नागरिकांना दुबार घेण्यास मदत झाली असती. पण या प्रकल्पाचे सुध्दा भिजत घोंगडे कायम आहे.

.......

कंटगी व निमगाव प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्प, निमगाव लघु प्रकल्पाचे काम सुद्धा मागील २५ वर्षांपासून जमीन अधिग्रहण आणि झुडपी जंगलामुळे रखडले आहे. कटंगी प्रकल्पाचे काम बरेच पूर्ण झाले असून जमिनी अधिग्रहण करण्यावरुन या प्रकल्पाचे घोडे अडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.

.....

रिक्त पदांचा सिंचन निर्मितीवर परिणाम

गोंदिया सिंचन विभागात मागील एक दोन वर्षांपासून एकूण ८२६ मंजूर पदांपैकी केवळ १६८ पदे भरली असून जवळपास ८० टक्के पदे रिक्त आहेत. याचा सुद्धा सिंचन निर्मितीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून सद्यस्थितीत केवळ १ लाख १६ हजार हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे.

.......

कोट

गावालगत मोठे सिंचन प्रकल्प असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी या प्रकल्पांचा कसलाच उपयोग होत नाही. या प्रकल्पाचे पाणी मिळाले असते तर दुबार पीक घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली असती.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी, लोधीटोला

......

कटंगी मध्यम प्रकल्पाचे काम जमिनी अधिग्रहणामुळे मागील २५ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

- देवालाल बिसेन, शेतकरी

......

सिंचन प्रकल्पाची कामे वर्षानुवर्षांपासून रखडली असल्याने शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प केवळ नाममात्र ठरत आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

- राधेश्याम मेश्राम, शेतकरी.

............