शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

८ कोटी रुपयांचा बेवारटोला प्रकल्प पोहोचला ३५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

........ धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे ...

........

धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी

तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांची निधीची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असून जवळपास २८ गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. टप्पा एकचे काम पूर्ण झाले असून टप्पा दोनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी महिनाभरापूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली हाेती. त्याला मंत्री जयंत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली होती.

.......

झाशीनगर उपसा सिंचन केव्हा होणार पूर्ण

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले; मात्र उर्वरित ३० टक्के रखडले असल्याने ३०४५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दोनदा भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते; मात्र बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन आणि मोबदला देण्यावरुन या प्रकल्पाचे काम सुद्धा रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता परिसरातील नागरिकांना दुबार घेण्यास मदत झाली असती. पण या प्रकल्पाचे सुध्दा भिजत घोंगडे कायम आहे.

.......

कंटगी व निमगाव प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्प, निमगाव लघु प्रकल्पाचे काम सुद्धा मागील २५ वर्षांपासून जमीन अधिग्रहण आणि झुडपी जंगलामुळे रखडले आहे. कटंगी प्रकल्पाचे काम बरेच पूर्ण झाले असून जमिनी अधिग्रहण करण्यावरुन या प्रकल्पाचे घोडे अडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.

.....

रिक्त पदांचा सिंचन निर्मितीवर परिणाम

गोंदिया सिंचन विभागात मागील एक दोन वर्षांपासून एकूण ८२६ मंजूर पदांपैकी केवळ १६८ पदे भरली असून जवळपास ८० टक्के पदे रिक्त आहेत. याचा सुद्धा सिंचन निर्मितीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून सद्यस्थितीत केवळ १ लाख १६ हजार हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे.

.......

कोट

गावालगत मोठे सिंचन प्रकल्प असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी या प्रकल्पांचा कसलाच उपयोग होत नाही. या प्रकल्पाचे पाणी मिळाले असते तर दुबार पीक घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली असती.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी, लोधीटोला

......

कटंगी मध्यम प्रकल्पाचे काम जमिनी अधिग्रहणामुळे मागील २५ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

- देवालाल बिसेन, शेतकरी

......

सिंचन प्रकल्पाची कामे वर्षानुवर्षांपासून रखडली असल्याने शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प केवळ नाममात्र ठरत आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

- राधेश्याम मेश्राम, शेतकरी.

............