शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

८ कोटी रुपयांचा बेवारटोला प्रकल्प पोहोचला ३५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

........ धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे ...

........

धापेवाडा टप्पा दोनसाठी हवा १०० कोटी रुपयांचा निधी

तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांची निधीची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असून जवळपास २८ गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. टप्पा एकचे काम पूर्ण झाले असून टप्पा दोनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी महिनाभरापूर्वीच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली हाेती. त्याला मंत्री जयंत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली होती.

.......

झाशीनगर उपसा सिंचन केव्हा होणार पूर्ण

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले; मात्र उर्वरित ३० टक्के रखडले असल्याने ३०४५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दोनदा भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते; मात्र बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन आणि मोबदला देण्यावरुन या प्रकल्पाचे काम सुद्धा रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता परिसरातील नागरिकांना दुबार घेण्यास मदत झाली असती. पण या प्रकल्पाचे सुध्दा भिजत घोंगडे कायम आहे.

.......

कंटगी व निमगाव प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला

गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्प, निमगाव लघु प्रकल्पाचे काम सुद्धा मागील २५ वर्षांपासून जमीन अधिग्रहण आणि झुडपी जंगलामुळे रखडले आहे. कटंगी प्रकल्पाचे काम बरेच पूर्ण झाले असून जमिनी अधिग्रहण करण्यावरुन या प्रकल्पाचे घोडे अडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे.

.....

रिक्त पदांचा सिंचन निर्मितीवर परिणाम

गोंदिया सिंचन विभागात मागील एक दोन वर्षांपासून एकूण ८२६ मंजूर पदांपैकी केवळ १६८ पदे भरली असून जवळपास ८० टक्के पदे रिक्त आहेत. याचा सुद्धा सिंचन निर्मितीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून सद्यस्थितीत केवळ १ लाख १६ हजार हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे.

.......

कोट

गावालगत मोठे सिंचन प्रकल्प असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी या प्रकल्पांचा कसलाच उपयोग होत नाही. या प्रकल्पाचे पाणी मिळाले असते तर दुबार पीक घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली असती.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी, लोधीटोला

......

कटंगी मध्यम प्रकल्पाचे काम जमिनी अधिग्रहणामुळे मागील २५ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

- देवालाल बिसेन, शेतकरी

......

सिंचन प्रकल्पाची कामे वर्षानुवर्षांपासून रखडली असल्याने शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प केवळ नाममात्र ठरत आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे.

- राधेश्याम मेश्राम, शेतकरी.

............