शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बेवारटोला सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:13 IST

रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी : कचारगड विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आज (दि.१८) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बेवारटोला सिंचन प्रकल्पासह कुवाढास कालव्याचे काम रेल्वे विभागाच्या परवानगी अभावी अनेक वर्षांपासून रखडले असल्याची बाब आ.संजय पुराम यांनी निदर्शनास आणून दिली. खा.अशोक नेते आणि पुराम यांनी यासंबंधी कुठली अडचण आहे याचा प्रस्ताव आपल्याकडे त्वरीत सादर करावा. रेल्वे मंत्र्यांशी बोलून कुवाढास कालव्याची समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिली.समस्त आदिवासी आणि गोंडी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक आराखडा तयार करुन या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल आपण सुध्दा त्यांचे अभार मानतो. कचारगड तीर्थ आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा केंद्र व राज्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन देशातील सर्वोकृष्ट पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढकाराने अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य विषयक सर्व तपासण्या करुन नि:शुल्क औषधे दिले जात आहे. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी या वेळी केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्वांगिन करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरु आहेत.यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. गोंडी संस्कृती फार प्राचीन असून या संस्कृती आणि वारसाचे जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निश्चितच उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या वेळी राजकुमार बडोले, संजय पुराम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले.अटल आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणीकोया पुनेम महोत्सवानिमित्त कचारगड येथे आयोजित यात्रेचे औचित्य साधून आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढाकाराने व जिल्हा आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अटल आरोग्य शिबिर सोमवारी (दि.१८) कचारगड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नि:शुल्क आरोग्य तपासणी व उपचाराची सोय एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करुन उपचार व नि:शुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे प्रथमच यात्रा स्थळी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याने अनेक रुग्णांना मदत झाली.