शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बेवारटोला सिंचन प्रकल्प मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:13 IST

रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी : कचारगड विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय व धोरण आहे. त्यादृष्टीने राज्यात आणि देशात मागील साडेचार वर्षांत अनेक कामे करण्यात आली. या परिसरातील बेवारटोला सिंचन प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करुन हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आज (दि.१८) आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, बेवारटोला सिंचन प्रकल्पासह कुवाढास कालव्याचे काम रेल्वे विभागाच्या परवानगी अभावी अनेक वर्षांपासून रखडले असल्याची बाब आ.संजय पुराम यांनी निदर्शनास आणून दिली. खा.अशोक नेते आणि पुराम यांनी यासंबंधी कुठली अडचण आहे याचा प्रस्ताव आपल्याकडे त्वरीत सादर करावा. रेल्वे मंत्र्यांशी बोलून कुवाढास कालव्याची समस्या सुध्दा मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिली.समस्त आदिवासी आणि गोंडी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्रीे देवेंद्र फडणवीस यांनी विकासात्मक आराखडा तयार करुन या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल आपण सुध्दा त्यांचे अभार मानतो. कचारगड तीर्थ आणि पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा केंद्र व राज्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन देशातील सर्वोकृष्ट पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढकाराने अटल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आरोग्य विषयक सर्व तपासण्या करुन नि:शुल्क औषधे दिले जात आहे. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी या वेळी केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्वांगिन करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरु आहेत.यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. गोंडी संस्कृती फार प्राचीन असून या संस्कृती आणि वारसाचे जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निश्चितच उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या वेळी राजकुमार बडोले, संजय पुराम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी मांडले.अटल आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणीकोया पुनेम महोत्सवानिमित्त कचारगड येथे आयोजित यात्रेचे औचित्य साधून आ.डॉ.परिणय फुके यांच्या पुढाकाराने व जिल्हा आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अटल आरोग्य शिबिर सोमवारी (दि.१८) कचारगड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नि:शुल्क आरोग्य तपासणी व उपचाराची सोय एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी करुन उपचार व नि:शुल्क औषधांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे प्रथमच यात्रा स्थळी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आल्याने अनेक रुग्णांना मदत झाली.