शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

एकाच लाभार्थीला दोन वेळा दिला लाभ

By admin | Updated: November 20, 2014 22:55 IST

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

परसवाडा : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात सरपंच व ग्रामसेवक एस.एस.गौतम यांनी चिरमिरी घेतल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अतीगरजू, गरीब, भूमिहिन, ज्यांचे घरच नाही व घर जीर्ण असून ज्यांची घर बांधणीची क्षमता नाही अशांची यादी ग्रामसभा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करुन पंचायत समितीला पाठविली जाते. पण यादीत २००२ मध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला त्यांची नावे दुसऱ्यांदा समाविष्ट करून पाठविण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये ८६ लाभार्थीची यादी पाठविण्यात आली. त्यात ८१ बी.पी. एल. सर्वसाधारण व पाच अनु. जातीचे असून काही लाभार्थ्यांना २००५-०६ च्या इंदिरा आवास प्रतीक्षा यादीतूनही लाभ मिळाला आहे. त्यांचे नाव वगळणे व यादीतुन कमी करणे हे ग्रामसेवक गौतम यांचे काम होते. पण त्यांनी वगळले नाही परिणामी त्यांना दुसऱ्यांदा योजनेचा लाभ मिळाला असून घरकुलांचे आजघडीला काम सुरु आहे. अशांत सुरज पोतण पटले सोनपुरी (पोलटोला) बीपीएल क्र. १०, देबीलाल पोतन पटले बीपीएल -१८, नानाजी शिवदास वैद्य (चन्नदाबाई)बीएल क्र. ९८, राधेलाल चरण कोहरे-बपीएल क्र.६३, सुभाष हरिदास मेश्राम बीपीएल -९५, नरेंद्र बिसराज वैद्य-बीपीएल-९२, धनीराम गरीबा वैद्य (कोसल्या) बीपीएल क्र.८७, हरतीमा मोतीराम मेश्राम बीपीएल क्र. ८८, बसतराम मोहणलाल बीपीएल क्र. १४,धनराज रघुनाथ आडकने बीपीएल -५० यांचा समावेश आहे. यांच्यासाठी मात्र संजय हरिचंद उके बीपीएल क्र. ६९, नत्थु काशीराम चौरागडे,बीपीएल क्र. ६२, गुणराज भीवाजी नेवारे,बीपीएल क्र.-४१ या अती गरजू, गरीत व बेघरांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. याप्रकरणी ग्रामसभेत व मासीक सभेत ग्रां.प. सदस्य नटवरलाल गुजलाल जैतवार यांनी प्रश्न उपस्थित केला असता गौतम यांनी उत्तर दिले नाही. उलट सभा लवकरच गुंडाळून ते वरिष्ठांचे नाव सांगून निघून गेले. घरकुल योजनेत सरपंच व ग्रामसेवक यांनी यादीतील प्रत्येक लाभार्थ्यांकडून १० हजार रुपये घेऊन त्यांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप जैतवार यांनी केला आहे. तशी तक्रार खंडविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना केली आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाहीची मागणी जैतवार यांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक गौतम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय ते गावात आठवड्यातुन एकदा येत असल्याचे जैतवार यांनी सांगितले. (वार्ताहर)