शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पीक विम्याचा लाभ विमा कंपन्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:26 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी एकाही शेतकऱ्याला लाभ नाही : ४१ हजार ७४० शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाºया शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ न मिळाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे पीक विम्याचा लाभ केवळ विमा कंपन्यांनाच होत आहे.अतिवृष्टी, दुष्काळ आणि किडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघत नाही. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्थकारात. शेतकºयांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पिकांना संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र विमा कंपन्याच्या चुकीच्या धोरणामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार ६४७ शेतकऱ्यांनी तर ९४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी यासर्व शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख रुपये विमा कंपन्याकडे भरले. मात्र पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. याला कृषी विभागाने सुध्दा दुजारो दिला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी विम्या कंपन्यानी एक नियमावली तयारी केली आहे. यासाठी त्यांनी महसूल मंडळात हवामान माहिती केंद्र उभारले आहे. या केंद्रावर होणाऱ्या नोंदणीनुसार विमा कंपन्या परतावा देतात. पण गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न झाल्याचे सांगत पीक विम्याचा परतावा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती