शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

पीक विम्याचा लाभ विमा कंपन्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:26 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी एकाही शेतकऱ्याला लाभ नाही : ४१ हजार ७४० शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाºया शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ न मिळाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे पीक विम्याचा लाभ केवळ विमा कंपन्यांनाच होत आहे.अतिवृष्टी, दुष्काळ आणि किडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघत नाही. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्थकारात. शेतकºयांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पिकांना संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र विमा कंपन्याच्या चुकीच्या धोरणामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार ६४७ शेतकऱ्यांनी तर ९४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी यासर्व शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख रुपये विमा कंपन्याकडे भरले. मात्र पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. याला कृषी विभागाने सुध्दा दुजारो दिला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी विम्या कंपन्यानी एक नियमावली तयारी केली आहे. यासाठी त्यांनी महसूल मंडळात हवामान माहिती केंद्र उभारले आहे. या केंद्रावर होणाऱ्या नोंदणीनुसार विमा कंपन्या परतावा देतात. पण गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न झाल्याचे सांगत पीक विम्याचा परतावा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती