शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचा लाभ विमा कंपन्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:26 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी एकाही शेतकऱ्याला लाभ नाही : ४१ हजार ७४० शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतंर्गत पीक विमा काढणाºया शेतकऱ्यांना परतावाच मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ न मिळाल्याची बाब पुढे आली. त्यामुळे पीक विम्याचा लाभ केवळ विमा कंपन्यांनाच होत आहे.अतिवृष्टी, दुष्काळ आणि किडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघत नाही. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्थकारात. शेतकºयांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पिकांना संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र विमा कंपन्याच्या चुकीच्या धोरणामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार ६४७ शेतकऱ्यांनी तर ९४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी यासर्व शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख रुपये विमा कंपन्याकडे भरले. मात्र पीक विमा काढलेल्या एकाही शेतकऱ्याला विम्याचा लाभ मिळाला नाही. याला कृषी विभागाने सुध्दा दुजारो दिला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी विम्या कंपन्यानी एक नियमावली तयारी केली आहे. यासाठी त्यांनी महसूल मंडळात हवामान माहिती केंद्र उभारले आहे. या केंद्रावर होणाऱ्या नोंदणीनुसार विमा कंपन्या परतावा देतात. पण गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न झाल्याचे सांगत पीक विम्याचा परतावा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती