शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

२२ हजार कामगारांना योजनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:57 IST

कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली.

ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ : ४ कोटी ४९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली.विकास प्रक्रि येत कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. कामगार काम करीत असतांना त्याला सुरक्षितता मिळावी,आरोग्याच्या सुविधांसह अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांचा रोजगार व कल्याणासाठी सेवा शर्तीचे नियमन करु न महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. जिल्ह्यात या मंडळाकडे नोंदणी केलेल्या २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली. जिल्ह्यातील १८ ते ६० वयोगटातील बांधकाम कामगार आणि मागील १२ महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेल्या कामगारांना, त्यांच्या पाल्यांना तसेच पत्नीच्या प्रसुतीसाठी मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून आर्थिक मदत देण्यात आली. कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नोंदणी जिवित असलेल्या जिल्ह्यातील १५६ लाभार्थी कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रती कामगार ३ हजार रु पये याप्रमाणे ४ लाख ६८ हजार रु पयांची मदत करण्यात आली आहे. १४ कामगारांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी २ लाख ५० हजार रु पयांची आर्थिक मदत करण्यात आली. इयत्ता पहिली ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी, इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या १४३ पाल्यांना ६ लाख १२ हजार ५०० रु पये शैक्षणिक व प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. १४ पाल्यांना पदवीच्या शिक्षणासाठी प्रत्येकी २० हजार रु पये याप्रमाणे २ लाख ८० हजार रु पये महाविद्यालय प्रवेश, पुस्तके आणि शैक्षणिक सामुग्रीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. नोंदणीकृत तीन कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबांना अंत्यविधी योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रु पयांची आर्थिक मदत अंत्यविधीसाठी करण्यात आली आहे. चार विधवा पत्नींना प्रत्येकी २४ हजार रु पये प्रमाणे ९६ हजार रु पयांची मदत करण्यात आली. विवाह करणाºया दोन कामगार लाभार्थ्यास प्रत्येकी ३० हजार रु पये विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी अनुदान देण्यात आले आहे.८७ कामगारांच्या ९८ पाल्यांना पुस्तक संच देण्यात आले. जिल्ह्यातील ८ हजार ६३६ नोंदणीकृत कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रु पयापर्यंत अनुदान देण्यात आले. १३०० कामगारांना कौशल्य विकास वृध्दीकरण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विविध २८ कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात दिला जात आहे.