शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : उपायुक्तपदी बढती झालेल्या डीपीओंचा सत्कारगोंदिया : प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल ज्ञान आणि कामाचा दांडगा अनुभव असेल तर अधिकारी यशस्वी होतो. घाटे यांच्याकडे हे गुण असल्यामुळे ते यशस्वी अधिकारी ठरले, असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपायुक्त (नियोजन) म्हणून पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सत्कारमूर्ती बकूल घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी ठाकरे, शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी भूते, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन अधिकारी चांगला असेल तर कामात यश मिळते. विविध यंत्रणांना दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च व्हावा यासाठी नियोजन अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु न तो निधी वेळेतच खर्च झाला पाहिजे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असावे. घाटे यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीची सभा आपले कौशल्य वापरु न व विषयांची योग्यप्रकारे मांडणी करु न यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्यालयात काही पदे रिक्त असतानादेखील त्यांनी चांगले काम केले आहे. जिल्हा नियोजन समतीच्या निधीचा त्यांनी चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. मार्च २०१६ अखेर १०० टक्के डीपीडीसीचा निधी त्यांच्या माध्यमातून यंत्रणांनी खर्च केला आहे. घाटे यांनी त्यांच्या कार्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.सत्काराला उत्तर देताना घाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या यादेखील यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करताना विविध यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी व निधी वेळेवर खर्च करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.मोहिते म्हणाले की, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करु न काम केले तर चांगल्याप्रकारे आपण यशस्वी होतो, हे घाटे यांनी सिद्ध करु न दाखिवले, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घाटे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रूजू झालेले तेजबहादूर तिडके यांच्याही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.या वेळी लोणकर, तिडके, भूत, बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माला जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन कार्यालय, सांख्यिकी कार्यालय, रोहयो कार्यालय, भूसंपादन कार्यालय, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कडू यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)