शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : उपायुक्तपदी बढती झालेल्या डीपीओंचा सत्कारगोंदिया : प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल ज्ञान आणि कामाचा दांडगा अनुभव असेल तर अधिकारी यशस्वी होतो. घाटे यांच्याकडे हे गुण असल्यामुळे ते यशस्वी अधिकारी ठरले, असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपायुक्त (नियोजन) म्हणून पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सत्कारमूर्ती बकूल घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी ठाकरे, शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी भूते, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन अधिकारी चांगला असेल तर कामात यश मिळते. विविध यंत्रणांना दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च व्हावा यासाठी नियोजन अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु न तो निधी वेळेतच खर्च झाला पाहिजे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असावे. घाटे यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीची सभा आपले कौशल्य वापरु न व विषयांची योग्यप्रकारे मांडणी करु न यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्यालयात काही पदे रिक्त असतानादेखील त्यांनी चांगले काम केले आहे. जिल्हा नियोजन समतीच्या निधीचा त्यांनी चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. मार्च २०१६ अखेर १०० टक्के डीपीडीसीचा निधी त्यांच्या माध्यमातून यंत्रणांनी खर्च केला आहे. घाटे यांनी त्यांच्या कार्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.सत्काराला उत्तर देताना घाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या यादेखील यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करताना विविध यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी व निधी वेळेवर खर्च करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.मोहिते म्हणाले की, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करु न काम केले तर चांगल्याप्रकारे आपण यशस्वी होतो, हे घाटे यांनी सिद्ध करु न दाखिवले, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घाटे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रूजू झालेले तेजबहादूर तिडके यांच्याही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.या वेळी लोणकर, तिडके, भूत, बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माला जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन कार्यालय, सांख्यिकी कार्यालय, रोहयो कार्यालय, भूसंपादन कार्यालय, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कडू यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)