शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शासनाच्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:59 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे.

ठळक मुद्देदिलीप हाथीबेड : सफाई कामगारांच्या प्रश्नांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. सफाई कर्मचारी साफसफाई करु न आपल्या कर्तव्याचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे हे आपले कर्तव्य समजून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न शासनाच्या विविध योजनांचा लाभ सफाई कामगारांपर्यंत पोहोचवा,असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिल्जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१७) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.एम.राजा दयानिधी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाली कदम, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे व निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक उपस्थित होते. हाथीबेड म्हणाले, नगर पालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे. सफाई कर्मचाºयांच्या पाल्ल्यांना शैक्षणकि पात्रतेच्या आधारावर नगर पालिकेनी सेवेत सामावून घ्यावे. सेवा ज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी,असे सांगितले. प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्तावर यावेळी चर्चा करण्यात आली.हाथीबेड यांनी विभागनिहाय सफाई कामगारांची संख्या व समस्यांची माहिती जाणून घेतली. सफाई कर्मचाऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचवावा यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना घरकूल देण्याची योजना आहे. त्यानुसार नगरपालिकने २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्याची सूचना यावेळी दिल्या. सामान्य रु ग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. समाज कल्याण विभागाने सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना वसतिगृहात प्राधान्याने प्रवेश देवून त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी असावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगरपरिषद, समाज कल्याण, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेण्यात आला.बैठकीस गोंदिया नगरपरिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी विजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रु खमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विनोद ठाकुर व लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप सिल्हारे उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी