शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जनजाती समाजाला शासकीय योजनांचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:20 IST

जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवनवासी कल्याण आश्रमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.मंगळवार (दि.३०)वनवासी आश्रमच्या शिष्टमंडळाच्या वतीने समाजाच्या समस्या व मागण्यांची माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून विदर्भ वनवासी कल्याण आश्रम ही संस्था अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी सन १९७८ पासून संलग्न आहे.विदभार्तील जनजाती समाजाकरीता विशेष प्रकल्पामार्फत जनजाती बहुल जिल्हा, तालुक्यात आणि जिथे जनजाती समाज राहतो,अशा ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जनजाती समाजाच्या घटनादत्त न्याय मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रम सातत्याने विविध पातळीवर लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे. परंतु, शासनाचे जनजाती समाजाच्या प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे समाज शासकीय योजना, सोयी-सवलतींपासून वंचित आहे. आपल्या न्याय मागणीसाठी वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने सध्या राज्यव्यापी मोहिम राबविली जात आहे.आदिवासींच्या सुविधांच्या व हक्काच्या बेकायदेशीपणे उपयोग करणाºया बोगस आदिवासींची चौकशी करुन त्यांचे जनजाती म्हणून सर्व अधिकार काढून शिक्षा करण्यात यावी. वन अधिकार कायद्याअंतर्गत परंपरा जंगल भूमी, जलसंपदा आमच्या हक्काचे असून व्यक्तिगत, सामुहिक वनहक्क प्राप्तीसाठी विलंब होत आहे. विशेष योजना राबवावे, जनजातीबहूल क्षेत्र पेसा अंतर्गत सरकारने त्वरीत घोषीत करावे. पेसा नियमाप्रमाणे ग्रामसभांची मान्यता व स्वतंत्र कोष खाते क्रियान्वित करावे.जनजाती वीर, हुतात्मे यांच्या जयंती, स्मृतीदिन शासकीय पातळीवर साजरे व्हावेत, प्राथमिक ते पदवी शिक्षणासाठी ज्या सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने प्रभावी यंत्रणा राबवावी. जनजातीतील लोककला, संस्कृती, देवदेवता, उत्सव, परंपरांचे संवर्धन करुन विशेष संरक्षण व आर्थिक सहाय द्यावे. वनवासींना शासकीय लाभासाठी आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे. गोंदिया तालुक्यात मुलांमुलींसाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे, वनवासींना रोजगार देऊन त्यांचे स्थलांतरण थांबविण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात वनवासी कल्याण आश्रमचे नगर अध्यक्ष जयदिप जसानी, डॉ.नाजुकराव कुंभरे, शंकरलाल मडावी, गुलाब गेडाम, रामेश्वर शेंडे, श्रीधर चुटे, सुशिला मानकर, मंदा पिहीदे, रामानंद राऊत, नेमेश्वर बसोने, बाळकृष्ण बिसेन, राहूल वैद्य, ओ.पी.गुप्ता, दलजीत खालसा, अनुप कटारे उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना