शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

जनजाती समाजाला शासकीय योजनांचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:20 IST

जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देवनवासी कल्याण आश्रमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे.मंगळवार (दि.३०)वनवासी आश्रमच्या शिष्टमंडळाच्या वतीने समाजाच्या समस्या व मागण्यांची माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून विदर्भ वनवासी कल्याण आश्रम ही संस्था अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी सन १९७८ पासून संलग्न आहे.विदभार्तील जनजाती समाजाकरीता विशेष प्रकल्पामार्फत जनजाती बहुल जिल्हा, तालुक्यात आणि जिथे जनजाती समाज राहतो,अशा ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जनजाती समाजाच्या घटनादत्त न्याय मागण्यांसाठी वनवासी कल्याण आश्रम सातत्याने विविध पातळीवर लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहे. परंतु, शासनाचे जनजाती समाजाच्या प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे समाज शासकीय योजना, सोयी-सवलतींपासून वंचित आहे. आपल्या न्याय मागणीसाठी वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने सध्या राज्यव्यापी मोहिम राबविली जात आहे.आदिवासींच्या सुविधांच्या व हक्काच्या बेकायदेशीपणे उपयोग करणाºया बोगस आदिवासींची चौकशी करुन त्यांचे जनजाती म्हणून सर्व अधिकार काढून शिक्षा करण्यात यावी. वन अधिकार कायद्याअंतर्गत परंपरा जंगल भूमी, जलसंपदा आमच्या हक्काचे असून व्यक्तिगत, सामुहिक वनहक्क प्राप्तीसाठी विलंब होत आहे. विशेष योजना राबवावे, जनजातीबहूल क्षेत्र पेसा अंतर्गत सरकारने त्वरीत घोषीत करावे. पेसा नियमाप्रमाणे ग्रामसभांची मान्यता व स्वतंत्र कोष खाते क्रियान्वित करावे.जनजाती वीर, हुतात्मे यांच्या जयंती, स्मृतीदिन शासकीय पातळीवर साजरे व्हावेत, प्राथमिक ते पदवी शिक्षणासाठी ज्या सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने प्रभावी यंत्रणा राबवावी. जनजातीतील लोककला, संस्कृती, देवदेवता, उत्सव, परंपरांचे संवर्धन करुन विशेष संरक्षण व आर्थिक सहाय द्यावे. वनवासींना शासकीय लाभासाठी आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्र त्वरीत देण्यात यावे. गोंदिया तालुक्यात मुलांमुलींसाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे, वनवासींना रोजगार देऊन त्यांचे स्थलांतरण थांबविण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात वनवासी कल्याण आश्रमचे नगर अध्यक्ष जयदिप जसानी, डॉ.नाजुकराव कुंभरे, शंकरलाल मडावी, गुलाब गेडाम, रामेश्वर शेंडे, श्रीधर चुटे, सुशिला मानकर, मंदा पिहीदे, रामानंद राऊत, नेमेश्वर बसोने, बाळकृष्ण बिसेन, राहूल वैद्य, ओ.पी.गुप्ता, दलजीत खालसा, अनुप कटारे उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना