शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘त्या’ वनरक्षकाच्या गळ्यात घंटा बांधा हो!

By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST

काही कर्मचार्‍यांनी नोकरी करताना स्वत:च्या कामात बेईमानी करुन अवैध व्यवसाय करण्याचा प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनविभाग सडक/अर्जुनी येथील एक

सडक/अर्जुनी : काही कर्मचार्‍यांनी नोकरी करताना स्वत:च्या कामात बेईमानी करुन अवैध व्यवसाय करण्याचा प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनविभाग सडक/अर्जुनी येथील एक वनरक्षकाने स्वत:च्या जंगलातून दोन बिजा जातीचे मोठे झाड कापून विकले. आपल्या तालुक्यातील त्या कत्तल झालेल्या झाडाची भनक वरिष्ठ अधिकार्‍यांना लागू नये यासाठी त्या हुशार वनरक्षकाने ट्रॅक्टरने दुसर्‍या जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावातील मोठय़ा पाटलाच्या घरी नेऊन ठेवले. त्या लाकडाची विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे.

शासकीय नोकरी करताना काही लोक

या प्रकरणातील वनरक्षक एवढय़ावरच थांबला नाही तर त्यांनी एक मजुराच्या हातून तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या खोडाला फोडून बाजूला केल्याची माहिती आहे. वनविभागाच्या नियमाप्रमाणे ज्याने कुणी चोरी करून पुरावा नष्ट करण्याचे कृत्य केले त्यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल होवू शकतो, परंतु तेही काम केल्या गेले नाही. आपल्या कामात गब्बर झालेल्या कर्मचार्‍यांवर वरिष्ठांची नजर राहणे गरजेचे आहे.

असेच प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात होत राहील्यास एक दिवस कुंपणच शेत खाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

सामाजिक वनीकरण व शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून गावागावात जागा दिसेल तिथे झाडे लावल्याची योजना राबवून शासन कोट्यवधी रुपये खर्च करताना दिसत आहे. पण वनविभागाचेच कर्मचारी जर स्वत:च्या बिटातून मोठय़ा वृक्षांची विल्हेवाट लावत असतील तर या शासनाच्या योजनेला काय अर्थ राहीले हा ही संशोधनाचा विषय आहे. माती अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा असा अनेक म्हणी आहेत. पण वनाचा रखवालदारच आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक नसेल तर वनाचा र्‍हास झाल्याशिवाय राहणार नाही. तो वनरक्षक कोण? असा सूर उमटत आहे.

बिनधास्तपणे असे कृत्य करणारा हा वनरक्षक एका मोठय़ा नेत्यांच्या वरदहस्ताखाली जगत असल्याचे सांगण्यात येते.

या वृक्षतोड प्रकरणातील या व्यवसायिक वनरक्षकाच्या शोध मोहीमेत, जर तो वनरक्षक मिळाला तर त्या कर्मचार्‍यावर कारवाही करण्यासाठी कोणता मोठा अधिकार पुढाकार घेवून कुणाचे गळ्यात घंटा बांधले ते पुढील वनविभागाचे चौकशीत दिसून येईल. याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशीही अपेक्षा केली जात आहे.

(शहर प्रतिनिधी)

‘जो भी होगा देखा जायेगा’ याप्रमाणे वागताना दिसतात. सध्या बेकारी एवढी बोकाळली आहे, की बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, तरी काही नोकरी करणार्‍यांना नोकरी टिकविता येत नाही, असे अनेक उदाहरण समोर येत आहे.‘पैसा कमाओ, पैसा बाटो’ असे करून पुढे-पुढे चालण्याची त्या वनरक्षकाची निती आहे. पण हे किती दिवस चालणार, याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.