शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विमानतळ सुरक्षारक्षकांनी घेतले उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:31 IST

बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांनी विमानतळ प्रशासनाविरोधात आपल्या मागण्यांना घेऊन १ फेबु्रवारीपासून साखळी उपोषण सुरु केले होते.

एसडीओ कार्यालयात समन्वय बैठक : विनोद अग्रवाल यांची मध्यस्थीगोंदिया : बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांनी विमानतळ प्रशासनाविरोधात आपल्या मागण्यांना घेऊन १ फेबु्रवारीपासून साखळी उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी विमानतळ प्रशासन व जिल्हा प्रशासनासोबत सुरक्षारक्षकांची समन्वय बैठक आयोजित करुन त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्तीने त्यांच्या प्रश्न निकाली लागला. ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, विमानपतन निदेशक सुभाष प्रजापती, दडवाल सिक्युरिटीज कंपनीचे संचालक कर्नल व्ही.के. यादव, विमानतळाचे सिक्युरिटी इंचार्ज एस.के. मलीक, बिरसीचे सरपंच रवी तावाडे, सामाजिक कार्यकर्ता अनुराग शुक्ला व सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात येईल, दर महिन्याला पगारासोबत पेमेंट स्लीप दिले जाईल, कुठल्याही कारणास्तव वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम सिक्युरिटी एजेंसी व विमानतळ अधिकाऱ्यांना याची लेखी माहिती देणे व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे ५ फेबु्रवारी रोजी विनोद अग्रवाल यांनी विमातळा समोर साखळी उपोषणावर बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मंडपाला भेट दिली. तद्नंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी राव व विमानतळ अधिकारी प्रजापती, सरपंच तावाडे यांना मंडपात आमंत्रित करुन सुरक्षा रक्षकांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी जि.प. सभापती छाया दसरे, दीपक कदम, जयंत शुक्ला, रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा व्हावी व यात सर्वच घटकांचा समावेश असावा याकरिता ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय अधिकारी राव यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेतूनच मागण्यांवर तोडगा निघाला. (शहर प्रतिनिधी)