शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

विभागप्रमुखांची वागणूक शिक्षकांच्या जिवावर बेतणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

सालेकसा : सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरत चालली आहे. त्यातच महाराष्ट्रात याचा उद्रेक अधिक तीव्रतेने वाढत ...

सालेकसा : सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरत चालली आहे. त्यातच महाराष्ट्रात याचा उद्रेक अधिक तीव्रतेने वाढत आहे. अशात प्रत्येकाला आपला जीव वाचविणे कठीण झाले आहे. दरम्यान, राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, विद्यार्थी वर्गाला शाळेत येण्यास मनाई केली आहे. सोबतच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनासुद्धा अनावश्यक शाळेला बोलावू नये, असे आदेशसुद्धा शिक्षण विभागाने काढले असले तरी आदिवासी विकास विभाग आश्रमशाळेच्या शिक्षकांना नियमित शाळेत बोलावून कोविड नियमांची व शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत.

त्यांचा हा मनमानी कारभार कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतणारा ठरत आहे. परिणामी अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून, काही शिक्षक मृत्यूशय्येपर्यंत पोहोचले आहेत. महामहीम राज्यपाल यांच्या दिनांक १३ एप्रिलच्या अध्यादेशात नमूद मुद्दा क्रमांक ९ च्या अंतर्गत केलेल्या मार्गदर्शन प्रणालीनुसार राज्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. त्यापूर्वी जिल्हाधिकारी गोंदिया यांचे ५ एप्रिलच्या आदेशानुसार शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला, तरी सुद्धा आदिवासी विभागात सर्व आश्रमशाळा १०० टक्के सुरू होत्या. १६ एप्रिलच्या आदेशात शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांना बोलावण्याची सक्ती करू नये, असा आदेश काढला तरी सुद्धा आश्रमशाळेत सर्वच कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे. मागील वर्षी कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला, त्यात शाळाही पूर्ण बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु आदिवासी प्रकल्पाने शिक्षकांना नियमित शाळेत बोलावले. वयस्क, व्याधीग्रस्त, दिव्यांग आणि महिला कर्मचारी यांना कोरोनासदृश परिस्थितीत राज्य शासनाकडून कर्तव्यापासून सूट दिलेली होती. केवळ आवश्यक असेल तरच बोलवा, असे स्पष्ट आदेश दिले होते तरीसुद्धा गरोदर महिला, आजारग्रस्त आणि वयस्क शिक्षकांना अनलॉक लर्निंग प्रोजेक्टच्या नावाखाली घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. दरम्यान, काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली व त्यांना औषधोपचारासाठी रजा घ्यावी लागली. परंतु, त्यांच्या मुख्याध्यापकांनी पगार कपात करण्याची कारवाई केली. यामुळे शिक्षकांमध्ये रोष व्यापत आहे.

.......

खासगी संस्थांमध्येही मुख्याध्यापकाची मनमानी

शालेय शिक्षण विभागांतर्गत शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढून शाळा बंद असताना कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता शिक्षकांना शाळेत येण्यास बाध्य करू नये, असे सांगितले, तरी सुद्धा खासगी संस्थांमधील काही मुख्याध्यापक आपल्या शिक्षकांना दररोज ११ ते ५ शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करतात. परिणामी अशा शाळांमध्ये निम्म्या शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून, काही शिक्षकांची प्रकृती अतिशय गंभीर झालेली आहे. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.