शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:07 IST

इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत गोंदिया पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान कार्यक्रम मंगळवारी (दि.२३) आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सायबर तज्ज्ञ पियूष वर्मा व आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्रच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. समाजाला सायबर गुन्हेगारी विषयी जागरुक करण्याची गरज आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुलांनी पोलीस विभागाच्या मदतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेतला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग चांगले काम करीत आहे. मागास व दुर्गम भागातील मुलामुलींमध्ये चांगली जडणघडण करण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुध्दा निर्माण करुन त्यांना यशाचा मार्ग दाखिवण्यात येत आहे. मुलांचे करियर घडविण्याचे काम पोलीस विभाग करीत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे बडोले यांनी सांगितले.वालदे म्हणाले, बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचा व्यवहार होत असतो. त्यासाठी नागरिकांनी बँकेत व्यवहार करताना सदैव जागरूक रहावे. सोशल मिडियावर आपली वैयक्तिक माहिती देवू नये, जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. यासाठी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी इंटरनेट बँकींग, फिशींग, मोबाईल बँकींग, स्मीशिंग, युपीआय, ई-वॅलेट, युएसएसडी, कार्ड, युपीआय याबाबत माहिती दिली.डॉ.भूजबळ म्हणाले, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियानामुळे बँकींग व्यवहाराबाबत होणारी आॅनलाईन फसवणूक, सोशल मिडियाबाबत होणारे गुन्हे याबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.या वेळी रामअवतार अग्रवाल, आदेश शर्मा व पोलीस निरीक्षक दासुरकर यांनी बँकींग फ्रॉड व्यवहाराबाबत काही प्रश्न विचारले. वालदे यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. सायबर जनजागृती कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) खन्ना, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम