शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सावधान ! आता निष्काळजीपणा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

गोंदिया : अवघ्या राज्यातीलच परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर चालली असून कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊनची पाळी आली आहे. तर, जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची ...

गोंदिया : अवघ्या राज्यातीलच परिस्थिती आता दिवसेंदिवस गंभीर चालली असून कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊनची पाळी आली आहे. तर, जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांनी जिल्ह्यात त्याचे पडसाद दिसून येत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सावधान होण्याची गरज असून आता निष्काळजीपणा परवडणारा ठरणार नाही.

कोरोनाने पुन्हा एकदा आपला उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, देशात कोरोना शिरल्यापासूनच राज्यात सर्वाधिक कहर केला आहे. तोच प्रकार सध्या पुन्हा एकदा बघावयास मिळत आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे, विदर्भात कोरोनाने नको तेवढा कहर केला असून याला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच केंद्रीय समितीने विदर्भाला सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा उद्रेक आता नागपूरपर्यंत आला असून सोमवारपासून नागपूरमध्ये लॉकडाऊन केले जाणार आहे. तर, आता जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

विशेष म्हणजे, नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्ह्यात उद्रेक होताे, असे आरोग्य विभागाच्या अभ्यासात बघावयास मिळाले आहे. म्हणजेच, आता नागपूरमध्ये कोरोना तांडव करीत असतानाच जिल्हावासीयांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे व तेथे लॉकडाऊन केले जाणार. त्याप्रकारे जिल्ह्यात आतापासूनच नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनाला परतावून लावता येणार आहे. मात्र, यासाठी आता नागरिकांनी गाफील न राहता उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची खरी गरज आहे.

-------------------------

लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करा

नियंत्रणात असलेला कोरोना आपले रूप पुन्हा एकदा दाखवून देत आहे. नागपूर व त्यापुढे कोरोनाने तांडव सुरू केले असून कित्येकांचा जीव जात असून हजारोंच्या संख्येत बाधित वाढत आहेत. उपाययोजनांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षाचे हे परिणाम आता जाणवू लागले असून कित्येक जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, जिल्ह्याला आता लॉकडाऊन परवडणारे नसून लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे.