शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

हक्कांसह कर्तव्याची जाणीव ठेवा!

By admin | Updated: March 23, 2017 01:02 IST

हक्कांसाठी धावपळ करीत असताना आपल्याला कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावत असेल

न्या. शाहीद खान : कावराबांधच्या फिरत्या न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन सालेकसा : हक्कांसाठी धावपळ करीत असताना आपल्याला कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावत असेल तर त्याला त्याचे अधिकार आपोआप मिळतात, असे प्रतिपादन आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश शाहीद खान यांनी केले. ते कावराबांध येथे फिरते न्यायालयाप्रसंगी घेण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. जिल्ह्यात या महिन्यात विविध ठिकाणी लोकअदालती स्वरूपात फिरते न्यायालय आयोजित करुन अनेक प्रकरणाचा ताबडतोब निपटारा करण्यात येत आहे. २१ मार्चला तालुक्यातील कावराबांध येथे ग्रामपंचायत परिसरात फिरते न्यायालय भरविण्यात आले होते. तत्पूर्वी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश शाहीद खान होते. मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. यु.बी. नागपुरे, सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सरकारी वकील के.के. चौरसिया, सामाजिक कार्यकर्ते जयश्री पुंडकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, विजय मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश शाहीद खान यांनी विविध विषयांवर कायदेविषयक सल्ला दिला. ते म्हणाले, कायद्यानुसार महिलांनासुद्धा पुरुषासारखे अधिकार आहेत, तरी पुरुषांनी महिलांच्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन गटात वाद विकोपाला जाते आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेला तर न्याय मिळो किंवा न मिळो, दोघांचे नुकसानच होते व फायदा कोण्या तिसऱ्याचा होतो. या बाबी लक्षात घेता वाद होऊ नये याचे भान ठेवून काम केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, पती-पत्नीच्या मध्ये निर्माण होणारे भांडण हे त्यांच्या दोघांचा संसार उद्धवस्त करणारे असते. म्हणून संसार थाटताना पती-पत्नीने आपसात समन्वय साधावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अ‍ॅड. उत्तम नागपुरे यांनी मौलीक अधिकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबलू मच्छिरके, पोलीस पाटील पोषणलाल बनोठे, सर्व ग्राम पंचायत सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात लोक अदालत घेऊन सहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती शाहीद यांनी हजर असणाऱ्या दोन्ही पक्षांना योग्यरित्या समजावून सांगितले व पुढे वाद निर्माण घेऊ नये यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला. संचालन व आभार ग्रामपंचायत सचिव रोकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी व्ही.सी. धावडे, व्ही.व्ही. मोहनकर, ए.एस. शेख, जे.एस. खांडेकर, चमन, हटवार, दालचंद मोहारे, युवराज दसरिया, विरेंद्र दसरिया, यादव नागपुरे, मोहन राठी, मयाराम लांजेवार, निर्मल मोहजारे, जागेश्वर दसरिया यांच्यासह पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)