शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बँकेच्या धोरणाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. परिणामी हे क्षेत्र पडीक ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. पेरणी न झाल्याने त्यांच्या सातबारावर पडीक क्षेत्र अशी नोंद तलाठ्याने केली. मात्र आता या नोंदीमुळे जिल्हा व राष्टÑीयीकृत बँकानी पीक कर्ज देण्यास नकार दिला. ...

ठळक मुद्देबँकाचा पीक कर्ज देण्यास नकार : पडीक जमीन दाखविल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. परिणामी हे क्षेत्र पडीक ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. पेरणी न झाल्याने त्यांच्या सातबारावर पडीक क्षेत्र अशी नोंद तलाठ्याने केली. मात्र आता या नोंदीमुळे जिल्हा व राष्टÑीयीकृत बँकानी पीक कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी मंगळवारी (दि.१०) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेला जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य सुरेश डोंगरे, सरपंच शिवाजी गहाणे, डुमेश चौरागडे उपस्थित होते. शासनाने जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया व गोरेगाव हे तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहे.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकºयांना १ एप्रिलपासून पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश सर्व बँका आणि सेवा सहकारी सोसायट्यांना दिले आहे. मात्र जेव्हा शेतकरी बँकेमध्ये पीक कर्जाची उचल करण्यासाठी जात आहे, तेव्हा पडीक क्षेत्र अशी नोंद असलेल्या शेतकºयांना कर्ज देता येत नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे. त्यामुळे निराश होवून शेतकºयांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.मागील वर्षी कमी पावसाअभावी बºयाच शेतकऱ्यांनी रोवणीच केली नाही. परिणामी शेती पडीक राहीली. तलाठ्याने त्यांच्या सातबारा आणि खसºयावर पडीक अशी नोंद केली. त्यामुळे नियमानुसार पडीक क्षेत्र असलेल्या शेतकºयाला कर्ज देता नसल्याचे सांगून कर्ज देण्यास बँका नकार देत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थानी देखील हेच धोरण अवलंबिल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली असल्याचा आरोप माजी आ. बन्सोड यांनी केला. विशेष म्हणजे शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती व पीक कर्ज देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यावर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या पातळीवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहे. बँका, जिल्हा प्रशासन व उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाºयांनी हा जीआरच वाचला नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.यासंदर्भात जिल्हा बँक व उपनिबंधकाना विचारणा केली असता आम्हाला या संदर्भात शासनाकडून कुठलेच निर्देश नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे बँकानी पीक कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकºयांना खरीप हंगामाची तयारी करायची कशी असा प्रश्न पडला आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर १५ दिवसात तोडगा काढवा अन्यथा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा बन्सोड यांनी दिला.विम्या कंपन्याकडून शेतकऱ्यांची लूटज्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल त्या गावातील शेतकरी पीक विम्यानुसार मदतीस पात्र आहे. मात्र विमा कंपन्यानी आपल्या स्तरावर निर्णय घेत २५ टक्के पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावातील शेतकºयांना पिक विम्याचा लाभ देण्याचे आदेश काढले आहे. यामुळे हजारो पीक विमाधारक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ही बाब शासनाला सुध्दा माहिती असून ते हेतूपुरस्पर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकंदरीत या सरकारला संविधानाची अ‍ॅलर्जी असल्याचा आरोप बन्सोड यांनी केला.पालकमंत्र्यांकडून दिशाभूलधान उत्पादक शेतकºयांना प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने सभागृहात केली होती. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही यासंदर्भात कुठलेच आदेश संबंधित विभागाला देण्यात आले नाही. बोनसची रक्कम अद्यापही शेतकºयांना मिळाली नाही. याबाबत काही शेतकºयांनी पालकमंत्र्यांना विचारणा केली असता यासंदर्भात पाठपुरावा करु सांगितले. सभागृहात निर्णय झाल्यानंतर पाठपुरावा करण्याची गरज काय? एकंदरीत पालकमंत्र्यांकडून शेतकºयांची दिशाभूल केली जात असून ते खोटे बोलत असल्याचा आरोप मा.आ.बन्सोड यांनी केला.जिल्हा प्रशासन निष्क्रीयपीक कर्ज, पाणी टंचाई, ठप्प पाणी पुरवठा योजना अशा गंभीर समस्या जिल्ह्यात निर्माण झाल्या असून यावर तोडगा काढण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विविध शासकीय विभागात नागरिकांची कामे वेळेवर होत नसून त्याचा फटका कामासाठी येणाºया नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासन पूर्णपणे निष्क्रीय झाले असल्याचा आरोप बन्सोड यांनी केला.