शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बँकेचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:57 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.

ठळक मुद्देग्रामीण भागाला फटका : बीएसएनएलचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने डिजीटल इंडियाचा नारा दिला. बहुतेक व्यवहार त्यामुळे आॅनलाईन केले जाते. शासकीय कार्यालय असो वा बँका आणि खासगी कार्यालयाचे कामकाज सुध्दा इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत. तर मोबाईल ही नागरिकांची आवश्यक गरज झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाल्यास सर्व व्यवहारांना ब्रेक लागत असल्याचे चित्र पाहयला मिळते. याचा अनुभव गोंदिया जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बुधवार व गुरूवारी आला. प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास गोंदिया-तुमसर सुमारास बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली होती. बुधवारी सायंकाळपासून बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे मोबाईल काम करीत नव्हते.त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बीएसएनएलची सेवा पुर्ववत सुरू झाली. मात्र ती सुध्दा मध्ये मध्ये बंद पडत असल्याने शहरातील सर्व बँकांची लिंक फेल झाली होती. त्यामुळे बँकाचे आर्थिक व्यवहार सुध्दा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरासह आमगाव व गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंटरनेटसेवा प्रभावित झाली होती. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयाकडे धाव घेत यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा केली असता ग्रामीण भागाचे इंचार्ज बैठकीसाठी गेल्याचे सांगितले.गोंदियाचे काम भंडाºयावरुनगोंदिया जिल्ह्याची निर्मिती होवून २० वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही येथील बीएसएनएल कार्यालयाचा कारभार भंडाºयावरुन सुरू आहे. केवळ तांत्रिक कामेच गोंदिया येथील कार्यालयातून होत आहे. त्यामुळे बरेचदा सेवेत बिघाड आल्यानंतर दुरूस्ती होण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.बांधकामाची माहिती नाहीबीएसएनएलच्या एका कर्मचाºयांने दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या रस्ता बांधकामाची माहिती या विभागाला मिळत नाही. रस्त्याच्या खोदकामादरम्यान इंटरनेटचे आॅपटीकल केबल तुटत असल्याने सेवा ठप्प होते. संबंधित विभागाने याची वेळीच माहिती दिल्यास उपाय योजना करण्यास मदत होईल असे सांगितले.