शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांना डोक्यावर नाही, त्यांचे विचार डोक्यात घ्या!

By admin | Updated: January 23, 2016 00:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली.

सुभाष खंडारे : बाबासाहेबांनी आचरणातून दिला व्यसनमुक्तीचा संदेशदेवानंद शहारे गोंदियाडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली. धम्माच्या पंचशीलातील पाचवे तत्त्व ‘सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्का पदमं समाजिदयामि’ म्हणजे मी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो, असे आहे. यावरून बाबासाहेबांची व्यसनमुक्त समाजाची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घेवू नका, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे मार्गदर्शन वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.येथील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांचे व्यसनमुक्तीबाबतचे विचार’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. डॉ.खंडारे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती संदर्भात कोणताही ग्रंथ लिहिला नाही. कोणत्याही संमेलनात व्यसनमुक्तीसंदर्भात भाषण दिले नाही. परंतु त्यांनी स्वत:च्या आचरणातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेला दिला. बाबासाहेबांना कुठलेही व्यसन नव्हते. कारण त्यांनी केलेली व्यसनाची व्याख्याच आगळीवेगळी आहे. ती अशी, ‘ज्यामुळे माणसाला लाचारी येते, तो गुन्हेगार बनतो व शेवटी त्याचे अध:पतन होते, त्या निरंतर क्रियेला व्यसन असे म्हणतात.’ व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजासाठी बाबासाहेबांनी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी भगवान तथागत बुद्धांचा धम्म दिला. ज्यात स्पष्टपणे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याची शक्ती आहे. दुसरे म्हणजे त्यांनी व्यक्तिविशेषाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. ज्यामुळे मनुष्य निर्भय होतो. त्यांच्या तीन दैवतांपैकी एक स्वाभिमान होते. तिसरी गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण हा आचरणाचा उत्कृष्ट पैलू बाबासाहेबांच्या जीवनातून येतो. ज्यामुळे दु:खमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. बाबाहेबांनी सांगितलेल्या या तीन विषयांची आज सर्वाधिक गरज आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रधान सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार अमोल मडामे यांनी मानले.आचरणातून पडतो प्रभावव्यसनमुक्तीबाबत कितीही चांगले मार्गदर्शन करण्यात आले तरी मार्गदर्शन करणारा जर स्वत: व्यसनी असेल तर त्याचा ऐकणाऱ्यांवर काहीही पडत नाही. मात्र मार्गदर्शन करणारा स्वत: व्यसनमुक्त असेल तर ग्रहण करणाऱ्यांवर प्रभाव पडतो. कृती व आचरणातून संदेश जाणे गरजेचे आहे, असे डॉ. खंडारे म्हणाले.