शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

बाबासाहेबांना डोक्यावर नाही, त्यांचे विचार डोक्यात घ्या!

By admin | Updated: January 23, 2016 00:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली.

सुभाष खंडारे : बाबासाहेबांनी आचरणातून दिला व्यसनमुक्तीचा संदेशदेवानंद शहारे गोंदियाडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली. धम्माच्या पंचशीलातील पाचवे तत्त्व ‘सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्का पदमं समाजिदयामि’ म्हणजे मी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो, असे आहे. यावरून बाबासाहेबांची व्यसनमुक्त समाजाची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घेवू नका, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे मार्गदर्शन वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.येथील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांचे व्यसनमुक्तीबाबतचे विचार’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. डॉ.खंडारे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती संदर्भात कोणताही ग्रंथ लिहिला नाही. कोणत्याही संमेलनात व्यसनमुक्तीसंदर्भात भाषण दिले नाही. परंतु त्यांनी स्वत:च्या आचरणातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेला दिला. बाबासाहेबांना कुठलेही व्यसन नव्हते. कारण त्यांनी केलेली व्यसनाची व्याख्याच आगळीवेगळी आहे. ती अशी, ‘ज्यामुळे माणसाला लाचारी येते, तो गुन्हेगार बनतो व शेवटी त्याचे अध:पतन होते, त्या निरंतर क्रियेला व्यसन असे म्हणतात.’ व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजासाठी बाबासाहेबांनी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी भगवान तथागत बुद्धांचा धम्म दिला. ज्यात स्पष्टपणे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याची शक्ती आहे. दुसरे म्हणजे त्यांनी व्यक्तिविशेषाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. ज्यामुळे मनुष्य निर्भय होतो. त्यांच्या तीन दैवतांपैकी एक स्वाभिमान होते. तिसरी गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण हा आचरणाचा उत्कृष्ट पैलू बाबासाहेबांच्या जीवनातून येतो. ज्यामुळे दु:खमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. बाबाहेबांनी सांगितलेल्या या तीन विषयांची आज सर्वाधिक गरज आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रधान सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार अमोल मडामे यांनी मानले.आचरणातून पडतो प्रभावव्यसनमुक्तीबाबत कितीही चांगले मार्गदर्शन करण्यात आले तरी मार्गदर्शन करणारा जर स्वत: व्यसनी असेल तर त्याचा ऐकणाऱ्यांवर काहीही पडत नाही. मात्र मार्गदर्शन करणारा स्वत: व्यसनमुक्त असेल तर ग्रहण करणाऱ्यांवर प्रभाव पडतो. कृती व आचरणातून संदेश जाणे गरजेचे आहे, असे डॉ. खंडारे म्हणाले.