शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

बाबासाहेबांना डोक्यावर नाही, त्यांचे विचार डोक्यात घ्या!

By admin | Updated: January 23, 2016 00:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली.

सुभाष खंडारे : बाबासाहेबांनी आचरणातून दिला व्यसनमुक्तीचा संदेशदेवानंद शहारे गोंदियाडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजाची होती. त्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला बुद्ध-धम्माची दीक्षा दिली. धम्माच्या पंचशीलातील पाचवे तत्त्व ‘सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणि सिक्का पदमं समाजिदयामि’ म्हणजे मी कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो, असे आहे. यावरून बाबासाहेबांची व्यसनमुक्त समाजाची दूरदृष्टी स्पष्ट होते. त्यामुळे बाबासाहेबांना डोक्यावर घेवू नका, तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे मार्गदर्शन वर्धा येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे यांनी व्यक्त केले.येथील चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांचे व्यसनमुक्तीबाबतचे विचार’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. डॉ.खंडारे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती संदर्भात कोणताही ग्रंथ लिहिला नाही. कोणत्याही संमेलनात व्यसनमुक्तीसंदर्भात भाषण दिले नाही. परंतु त्यांनी स्वत:च्या आचरणातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेला दिला. बाबासाहेबांना कुठलेही व्यसन नव्हते. कारण त्यांनी केलेली व्यसनाची व्याख्याच आगळीवेगळी आहे. ती अशी, ‘ज्यामुळे माणसाला लाचारी येते, तो गुन्हेगार बनतो व शेवटी त्याचे अध:पतन होते, त्या निरंतर क्रियेला व्यसन असे म्हणतात.’ व्यसनमुक्त व दु:खमुक्त समाजासाठी बाबासाहेबांनी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी भगवान तथागत बुद्धांचा धम्म दिला. ज्यात स्पष्टपणे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याची शक्ती आहे. दुसरे म्हणजे त्यांनी व्यक्तिविशेषाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. ज्यामुळे मनुष्य निर्भय होतो. त्यांच्या तीन दैवतांपैकी एक स्वाभिमान होते. तिसरी गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण हा आचरणाचा उत्कृष्ट पैलू बाबासाहेबांच्या जीवनातून येतो. ज्यामुळे दु:खमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. बाबाहेबांनी सांगितलेल्या या तीन विषयांची आज सर्वाधिक गरज आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रधान सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार अमोल मडामे यांनी मानले.आचरणातून पडतो प्रभावव्यसनमुक्तीबाबत कितीही चांगले मार्गदर्शन करण्यात आले तरी मार्गदर्शन करणारा जर स्वत: व्यसनी असेल तर त्याचा ऐकणाऱ्यांवर काहीही पडत नाही. मात्र मार्गदर्शन करणारा स्वत: व्यसनमुक्त असेल तर ग्रहण करणाऱ्यांवर प्रभाव पडतो. कृती व आचरणातून संदेश जाणे गरजेचे आहे, असे डॉ. खंडारे म्हणाले.