शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

फक्त छायाचित्रापुरतीच जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

एकदाच वापरात येत असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंवर राज्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र प्लास्टीक वस्तंूचा वापर सुरूच असून त्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहा आठवड्यांचा ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता ही सेवा’अभियानाचा विसर : नगर परिषदेला १० दिवसांनी आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यंदा सहा आठवड्यांचे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात प्लास्टीक बंदीबाबत ११ सप्टेंबरपासून जनजागृती करावयाची आहे. मात्र नगर परिषदेला १० दिवसांनंतर जाग आली असून शुक्रवारी (दि.२०) एक कार्यक्रम घेण्यात आला. मात्र हा कार्यक्रमात फक्त छायाचित्रा पुरताच जनजागृतीचा असल्याचे बोलल्या जाते.एकदाच वापरात येत असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंवर राज्यात बंदी लावण्यात आली आहे. मात्र प्लास्टीक वस्तंूचा वापर सुरूच असून त्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहा आठवड्यांचा ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा पहिला टप्पा ११ सप्टेंबरपासून सुरू करायचा होता. यासाठी महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्याकडून राज्यातील सर्वच नागरी संस्थांना ३१ ऑगस्ट रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार, गोंदिया नगर परिषदेनेही ११ सप्टेंबरपासून शहरात प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करणे अपेक्षित होते. मात्र नगर परिषदेला याचा विसर पडला असे दिसून येत आहे. कारण नगर परिषदेने शुक्रवारी (दि.२०) मालवीय शाळेत सफाई कर्मचारी व परिसरातील नागरिकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेतल्याची माहिती आहे. म्हणजेच, पहिल्या टप्प्यातील १० दिवस लोटल्यानंतर नगर परिषदेला जाग आल्याचे दिसते.या कार्यक्रमात सफाई कर्मचारी व नगर परिषद अधिकारी-कर्मचारीच जास्त होते अशी माहिती आहे. एकंदर, शासनाचे आदेश असल्याने व त्यातही हा प्रकार आता अंगलट येणार असल्याचे पाहून फक्त फोटो काढण्यापुरताच हा कार्यक्रम घेण्यात आला.असे आहेत अभियानातील तीन टप्पे‘स्वच्छता ही सेवा’अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात, ११ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावयाची आहे. दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी लोकसहभागातून शहरात श्रमदान करून प्लास्टीक कचरा गोळा करण्याची मोहीम राबवायची आहे. तर तिसऱ्या टप्प्यात, ३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान गोळा केलेला प्लास्टीक रिसायकलींगसाठी पाठवायचा आहे.टार्गेट प्लास्टीक मुक्त दिवाळीआजघडीला सर्वांनाच प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीकच्या वस्तू वापराची सवय जडली आहे. मात्र प्लास्टीकच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.त्यात आता दिवाळी तोंडावर आली असून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने प्लास्टीकचा कहर होणार. मात्र यंदा प्लास्टीक साहित्यांचा वापर न करता पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावता यावा, हे शासनाचे उद्दिष्ट आहे.यातूनच यंदा प्लास्टीक मुक्त दिवाळीचे शासनाचे टार्गेट आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका