शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पाण्याचा अपव्यय टाळा

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे.

आवाहन : जलजागृती साक्षरता कार्यक्रम इटखेडा : पृथ्वीतलावर सागर, महासागरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असले तरी मानव व इतर प्राणीमात्रांना हवे असलेले पाणी अत्यल्प आहे. पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती करणे अशक्य आहे. पाऊस पडत नसल्याने देशाच्या कोणत्यातरी भागात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पाण्याअभावी माणसे, पशुपक्षी व पिकांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यये टाळणे आता गरजेचे आहे.दुष्काळ पडला की सर्वत्र बोंबाबोंब सुरू होते. पाण्यासाठी माणसांमध्ये भांडणे व हाणामाऱ्या होत आहेत. जंगल परिसरातील पाण्याचे साठे आटल्यामुळे जंगली प्राणी मनुष्यवस्तीवर आक्रमण करीत आहेत. भविष्यात पाण्यासाठी युद्धे होतील. मानवी जीवनावर विघातक परिणाम होणाऱ्या गंभीर बाबींची दखल घेण्याची गरज निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने जनतेमध्ये जलजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले. त्या अन्वये समृध्दी पाणी वापर संस्था व ग्रामपंचायत इटखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कार्यक्रमात अतिथीनी सदर मनोगत व्यक्त केले. मर्यादीत स्वरूपात असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या गरजेवर भर दिला. पाण्याच्या अनिर्बंध गैरवापरामुळे पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांमध्ये जलजागृती व जलसाक्षरता निर्माण व्हावी व पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मनोहरराव चंद्रिकापुरे, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, सरपंच अस्मिता वैद्य, उपसरपंच वासुदेवराव उके, प्राचार्य लहू बोळणे, सुभाष देशमुख, इंद्रदास झिलपे, देवीदान पालीवाल, पुंडलिक धोटे, पोलीस पाटील विकास लांडगे, पुंडलिक धोेटे, शाखा अभियंता एस.व्ही. भवरे, समृध्दी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विलास भावे, सचिव विजय मेश्राम, मोरेश्वर गोंडाणे, शालिकराम भोयर, दामोधर चांदेवार, शालिकराम हुकरे, लिना येरणे, सुशिला गोंडाणे, चेतन शेंडे, प्रकाश रामटेके, तालुका कृषी अधिकारी मुनेश्वर, ए.एन. चव्हाण, सिध्दार्थ सुखदेवे, जे.एम. ठेंगरी यांच्यासह ग्रामस्थ बंधु-भगिनींची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी अध्यक्ष देविदान पालीवाल यांनी मांडले. संचालन करून आभार मोरेश्वर गोंडाणे यांनी मानले. ग्रामपंचायत, समृध्दी पाणी वापर संस्था, इसापूर, इटखेडा हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय व जि.प. प्राथमिक शाळा, ग्रामस्थ व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी जलजागृतीसाठी गावातील रस्त्यावरून पदयात्रा काढली.