शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

मिरवणुकांवरील अनावश्यक खर्च टाळलाच पाहीजे

By admin | Updated: September 15, 2016 00:22 IST

मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल-ताशे, आतिषबाजीने कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. या बाबी आवश्यक तेवढ्याच वापरून

लोकमत परिचर्चेतील सूर : सामाजिक भान आणि उत्सवातील पावित्र्य जपणे गरजेचेगोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल-ताशे, आतिषबाजीने कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. या बाबी आवश्यक तेवढ्याच वापरून मिरवणुकांमधील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळांनी पुढाकार घेतला पाहीजे, असा सूर ‘लोकमत परिचर्चे’त गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लोकमत कार्यालयात झालेल्या या चर्चेत छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबक जरोदे, उपाध्यक्ष संजय कुंभलवार, अपना गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरविंद तिवारी, संरक्षक दीपक अग्रवाल, शिवकृपा गणेश उत्सव मंडळाचे अतुल ढाले, अमर मिश्रा तसेच पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकांमधील अनावश्यक खर्च, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे आणि मानवी नुकसान, आवाजाच्या मर्यादेचे होणारे उल्लंघन, मिरवणुकीतील बडेजावपणासाठी केला जाणारा खर्च वाचवून समाजप्रबोधनपर देखाव्यांना प्राधान्य कसे देता येईल, अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष सहभागी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बजेजावपणा नको, उत्सवाचे पावित्र्य जपत त्याला गालबोट लागणारे कोणतेही कृत्य आमच्या मंडळाकडून घडणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्वाही दिली.पर्यावरण विभागाच्या नियमांचे आमच्याकडून दरवर्षीच पालन केले जाते. शिवाय सामाजिक भान ठेवत मंडळाकडून ३ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. १२ वर्षापूर्वी पूरपिडीतांना मदत केली होती, असे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचे त्र्यंबक जरोदे यांनी सांगितले. अरविंद तिवारी म्हणाले, आमचे गणेश मंडळ सजावटीला प्राधान्य देते. दररोज १० दिवस महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादाचा लाभ ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना होतो. त्यांना हॉटेलमधून पदार्थ विकत घेणे शक्य नसते. तेवढाच त्यांना दिलासा मिळतो. याशिवाय शहरात राहणारे विद्यार्थी, केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयातील रूग्णांचे नातेवाईक यांना यामुळे मोठा आधार वाटतो, असे अग्रवाल म्हणाले. डिजेच्या तालावर सिनेगीत वाजविणे टाळावे, गाण्यांमधूनही भक्तीभाव प्रकट व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहात असून गुलाल उधळणे आम्ही बंदच केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मिरवणूक काढताना मंडळाच्या लोकांनी रहदारीला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, रुग्णवाहिकेसाठी जागा मोकळी करावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे म्हणाले. गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)१४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी एकगणेशोत्सव उत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी झाल्या आहेत. जातिय दंगल होणाऱ्या राज्यातील १४ संवेदनशिल ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असल्याचे सांगण्यात आले.आवाजाची मर्यादा वाढवून द्या किंवा शिथिलता द्यासार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा ७५ डेसीबलपेक्षा जास्त नको असे नियम आहेत. परंतु ७५ डेसीबल आवाजात कोणताही डिजे बसत नाही. गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असताना आवाजाच्या या मर्यादेचे काटेकोर पालन केल्यास एकाही मंडळाला मिरवणूक काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे किमान विसर्जनाच्या दिवशी आवाजाची मर्यादा वाढवून द्यावी, किंवा नियमात शिथिलता द्यावी, अशी मागणी मंडळांनी केली.ही आहेत विसर्जन स्थळे शहरातील काही गणेश मंडळांकडून रजेगाव येथे गणपती विसर्जन केले जाते. शिवाय पांगोळी नदी, खमारी व छोटा गोंदिया, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव, गौरीनगर नाला, छोटा गोंदिया तलाव, साई मंदिर नाग तलाव, मुर्री गावतलाव व टेमनीघाट या ठिकाणी सार्वजनिक मंडळ व खाजगी गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. राहणार चोख बंदोबस्त बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलिसांनी मंडळांना दिवस वाटून दिलेच आहेत. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान शहरात शांतता व व्यवस्था कायम रहावी यासाठी चोख बंदोबस्त राहणार आहे. याकरिता पोलिसांनी होमगार्ड मागवून घेतले आहेत. शिवाय वाहतूक विभागाचे व पोलीस ठाण्यांतील कर्मचारी राहतील.