शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आदिवासी महामंडळाकडून बारदान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

केशोरी : गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बी धान हंगामातील धान शेतकऱ्यांनी स्वत:कडील बारदाना उपयोगात आणून आदिवासी महामंडळाला धानाची विक्री ...

केशोरी : गेल्या वर्षीच्या खरीप व रब्बी धान हंगामातील धान शेतकऱ्यांनी स्वत:कडील बारदाना उपयोगात आणून आदिवासी महामंडळाला धानाची विक्री केली होती. धानाच्या चुकाऱ्याबरोबर बारदान्याची रक्कम देण्यात येईल, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु तब्बल एक वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बारदान्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव, इळदा या तीन आधारभूत धान खरेदी केंद्रांमधून आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत या परिसरातील शेतकऱ्यांची सन २०१९-२० या वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील धान खरेदी केली. धान खरेदीसाठी महामंडळाकडे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या स्वत:जवळील बारदाना उपयोगात आणून धानाची विक्री केली. एक वर्षाचा कालावधी लोटूनही महामंडळाने शेतकऱ्यांना बारदान्याची रक्कम किंवा बारदाना परत दिली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केली असता महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचे सांगितले. आदिवासी महामंडळाजवळ बारदान्याची तरतूद नसेल तर किमान बारदाना शेतकऱ्यांना परत द्यावा. ज्या वेळेस शेतकऱ्यांचा बारदाना उपयोगात आणला गेला तेव्हा धानाच्या चुकाऱ्याबरोबर बारदान्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असे सांगून शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बारदान्याची रक्कम त्वरित बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.