शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:24 IST

मागील तीन वर्षात जिल्ह्यातील दोन गावात साथरोगांचा उद्रेक झाला. जिल्ह्यात यात्रा भरणारी १६ गावे आहेत. नदीच्या काठावर ८१ गावे असून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९९ गावे जोखीमग्रस्त आहेत. या गावांसाठी आरोग्य विभागाने स्पेशल प्लान तयार केला आहे. साथरोगावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी उपकेंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांत औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देगरोदर-स्तनदा माता व बालकांची लाईन लिस्टींग तयारचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादसंडे स्पेशल मुलाखत

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कमागील तीन वर्षात जिल्ह्यातील दोन गावात साथरोगांचा उद्रेक झाला. जिल्ह्यात यात्रा भरणारी १६ गावे आहेत. नदीच्या काठावर ८१ गावे असून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९९ गावे जोखीमग्रस्त आहेत. या गावांसाठी आरोग्य विभागाने स्पेशल प्लान तयार केला आहे. साथरोगावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी उपकेंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांत औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे.पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहीर, बाअ‍ेरवेल, नळ योजना मधील पाण्याची पातळी वाढत असते. गढूळ पाण्यामुळे सुक्ष्म जीवांची वाढ होते. त्यातून डायरीया, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, टायफॉईड इत्यादी आजारांचा उद्रेक होतो. या आजारांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी शुद्ध व सुरक्षीत पाणी आणि ताजा आहार घ्यावा, जेणे करून या साथरोगांना आळा घालता येईल, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून सांगितली.शुद्ध आणि संरक्षित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत व नगर परिषद यांची असते. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था काही वेळा आपल्या कामात दुर्लक्ष करीत असल्याने गावात साथरोग पसरतात. पावसाळ्याचे तीन महिने पुरेल एवढ्या ब्लिचींग पावडरचा साठा ग्रामपंचायतींनी आपल्याकडे ठेवावा. यात ३३ टक्यापेक्षा जास्त क्लोरीनचे प्रमाण असलेले ब्लिचींग पावडर ग्रामपंचायतीने खरेदी करावे. ब्लिचींग पावडर खरेदीनंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत गोंदियाला पाठवावे. पाण्याची टाकी महिन्यातून तीन वेळा धुवून स्वच्छ करावी. पाईप व नळ व्हॉल्व लिकेज होणार नाही याची दक्षता घ्यावी, नळ योजनेंतर्गत ज्या गावाला पाणी पुरवठा करण्यात येते ते पाणी पुरवठा करण्याच्या एक तासाअगोदर क्लोरीनेशन करून ओ.टी. परीक्षण करून क्लोरीनचे प्रमाण योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच पाणी पूरवठा करण्यात यावे. दूषित पाण्याच्या स्त्रोतावर त्वरीत शुद्धीकरणाची प्रक्रिया करावी. नागरिकांनी जेवण करण्यापूर्वी हात धुवावे, शौचालयातून बाहेर आल्यावर साबनाने हात धुवावे, शिळे व उघड्यावरील अन्न खाऊ नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, शेणखत व उकीरडे हे वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून दूर ठेवावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.साथरोगासंदर्भात माहितीसाठी किंवा साथरोगासंदर्भात लागणाऱ्या मदतीसाठी आरोग्य विभागाने १०४ ही टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण केंद्र असून त्याचा क्रमांक ०७१८२- २३११३६ असा आहे. १ जून ते २ आॅक्टोबर या काळात हे नियंत्रण केंद्र सुरू राहणार आहे. साथ रोगावर वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीकोणातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सात दिवस २४ तास याप्रमाणे या नियंत्रण कक्षात एक तंत्रज्ञ व एक परिचर अशा दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. रूग्णवाहीका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ६७ प्रकारच्या साथरोगांसाठी लागणारा औषधीसाठा प्रत्येक आरोग्य संस्थेत पोहचविण्यात आला असल्याचेही डॉ.पटले म्हणाले. साथ रोगांचा उद्रेक झाल्यास लागणाºया २१ प्रकारच्या इव्हीडेमीक किट प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात उपलब्ध करण्यात आल्या आहेत अशी माहितीही त्यांनी मुलाखतीतून दिली.