शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

चौकशीत दोषी आढळल्यानंतर कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बिहिरिया येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक ...

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बिहिरिया येथील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामात सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक कनिष्ट अधिकारी हे चौकशीत दोषी आढळले होते. मात्र त्यांच्यावर अद्यापही कारवाई करून पदावरून दूर करण्यात आले नाही. जि.प. मुख्यकारी अधिकारी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मोतीराम ठाकरे यांनी केला आहे. त्वरित कारवाई न केल्यास जि.प. समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बिहिररिया येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामात सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता यांनी संगनमत करून आर्थिक घोळ केला. याची लेखी तक्रार पुराव्यासह मोतीराम ठाकरे, गजानन जमईवार, पतीराम ठाकरे यांनी १५ एप्रिल २०१९ रोजी जिल्हा तक्रार निवारण समितीकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली. त्यानंतर समितीने ग्रामसेवकाकडून रेकाॅर्ड मागवून तपासणी केली असता त्यात ग्रामसेवक दोषी आढळले होते. तसेच या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी केली असता त्यात बोगस मजुरांची नावे नोंदवून मजुरी काढण्यात आली. तलाव खोलीकरणातील मातीचीसुद्धा विक्री केल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणात एकूण २५ जणांचे बयान नोंदविण्यात आले. मात्र यानंतरही दोषींवर कुठलीच कारवाई न करण्यात आल्याने ठाकरे यांनी लोकआयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. याचीच दखल घेत लोकाआयुक्तांनी गोंदिया जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र देऊन यासंदर्भात काय कारवाई केली, याचा अहवाल मागविला आहे. मात्र अद्यापही हा अहवाल सादर करण्यात आला नाही. अहवाल सादर करण्यास २३ एप्रिल २०२१ पर्यंत अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात यापूर्वीच विभागीय आयुक्तांनी चौकशी दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. पण जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्याचा आहे.

............

अधिकारी देत आहेत घोळ करणाऱ्याला अभय

मनरेगाच्या कामात आर्थिक घोळ केल्याचे चाैकशीत सिद्ध झाले आहे. तसेच याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे. मात्र याला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी घोळ करणाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप मोतीराम ठाकरे यांनी केला आहे.

...........