शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वे गाड्यांची सरासरी गती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. या आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीमुळे दपूम रेल्वेच्या गाड्यांच्या सरासरी गतीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले ...

ठळक मुद्देआॅटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली : प्रत्येक कि.मी. अंतरावर लागलेल्या सिग्नलवरून मिळणार गाड्यांची योग्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. या आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीमुळे दपूम रेल्वेच्या गाड्यांच्या सरासरी गतीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या गाड्यांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रवाशांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यामागे हा हेतू आहे. या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभाग गाड्यांच्या परिचालनात सर्वाधिक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. गाड्यांना दर किलोमीटर सुरक्षितरित्या समोर वाढविताना गाड्यांचा क्रम सतत विनाअडथळ्याने अबाधित रहावा व आपल्या गंतव्यापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी सदर विभाग कार्य करीत आहे. गाड्यांना आणखी अधिक गती प्रदान करण्याच्या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभागाद्वारे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली क्रमबद्ध पद्धतीने लागू करून बहुआयामी लाभ प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.रेल्वेमध्ये आतापर्यंत एका स्थानकापासून दुसºया स्थानकाचे अंतर पार केल्यानंतरच सिग्नल हिरवे होते. तेव्हाच दुसऱ्या गाडीला त्या मार्गावर समोर जाण्यासाठी सोडले जाते. परंतु आता काही रेल्वे मार्गांमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्या मार्गांवर प्रत्येक किलोमीटरमध्ये सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यामुळे एका स्थानकातून सुटून दुसऱ्या स्थानकावर पोहोचण्यापर्यंत जवळपास प्रत्येक किलोमीटरवर लागलेल्या सिग्नलवरून गेल्यावर गाडीच्या योग्य स्थितीची माहिती मिळते.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. याशिवाय बिलासपूर ते जयरामनगरपर्यंत १४ किलोमीटर, बिलासपूर ते बिल्हा स्टेशनपर्यंत १६ किमी व बिलासपूर ते घुटकू स्थानकापर्यंत १६ किमीच्या रेल्वे मार्गांना आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्याची स्वीकृती प्राप्त झाली आहे.गाड्यांना ट्रेस करणे होणार सुगमदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने अनेक लाभ रेल्वे प्रवासी व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या ग्राहकांना होणार आहे. संपूर्णपणे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू झाल्यास रेल्वे मार्गांच्या क्षमतेत मोठी वृद्धी होईल. त्यामुळे प्रत्येक गाडीच्या सरासरी गतीत मोठी वाढ होईल. गाड्यांना किमी दर किमी ट्रेस करणे सुगम होईल. त्यामुळे कोणत्याही एका मार्गावर गाड्यांच्या जमावाची स्थिती बनणार नाही. या प्रणालीतून संरक्षणाच्या दृष्टीने गाड्यांच्या परिचालनात चांगली सुधारणा होईल. त्यामुळे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली सर्व दृष्टीने सुविधाजनक व लाभदायक सिद्ध ठरण्याची शक्यता आहे.