शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बैठकी बाजार वसुलीसाठी होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:38 IST

नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेचा प्रयोग : पर्यायी व्यवस्थेसाठी धडपड, नगर परिषदेचे उत्पन्न वाढणार

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे. त्यामुळे उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर परिषद बाजार विभागाने निविदा काढली असून यात आॅनलाईन बोली लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर नवे अध्यक्ष व नव्या सदस्यांच्या नव्या पाळीला सुरूवात झाली. यांतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांच्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ कलम २७२ अंतर्गत बैठकी बाजार वसुली केली जात होती. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था करणे गरजेचे असून तशी अधिनियमांत नोंद आहे. यामुळे बाजार विभागाने नगराध्यक्षांच्या घोषणेनंतरही १४ फेब्रुवारी पर्यंत बाजार वसुली सुरू ठेवली. मात्र नगराध्यक्षांनी घोषणा केल्याने बाजारात दुकान लावणाऱ्यांकडून वसुली कर्मचाºयांना प्रतिसाद देण्यात आला नाही.बैठकी बाजार वसुलीतून बाजार विभागाला वार्षीक सुमारे सात लाख रूपयांचे उत्पन्न येत होते. मात्र अचानकच हे उत्पन्न बंद झाल्याने नगर परिषदेची आर्थिक अडचण वाढली होती. शिवाय अधिनियमात नोंद असल्यामुळे तेवढ्याच रकमेची पर्यायी व्यवस्था करणे नगर परिषदेला गरजेचे होते. मात्र बैठकी बाजार वसुली करू नये असा ठराव १६ मार्च २०१७ रोजीच्या विशेष सर्व साधारण सभेतही घेण्यात आला होता. यावर बाजार विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्टेडियम चौपाटी येथील २१ व खोजा मस्जीद फुटपाथ वरील १३ दुकानांकडून दरमहा एक हजार रूपये वसुली सुरू केली. मात्र यातही दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर बाजार वसुलीच्या या प्ररकरणाला घेऊन व नगर परिषदेची आर्थिक अडचण सोडविता यावी यासाठी नगराध्यक्ष इंगळे यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाºयांकडे ठराव रद्द करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता १५ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत बैठकी बाजार वसुलीसाठी कंत्राट देण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी नगर परिषदेच्या बाजार विभागाने १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूकांकडून निविदा मागविली असल्याची माहिती आहे.आॅनलाईन बोली लागणारनगर परिषदेच्या बाजार विभागाने बैठकी बाजार वसुली लिलावासाठी १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात किमान बोली ११ लाख रूपयांची ठेवण्यात आली आहे. यासाठी २६ मार्च रोजी आॅनलाईन बोली लावली जाणार असून त्यात ५ हजार रूपयांच्या पटीने बोली वाढविता येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नगर परिषदेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे येणाºया काळातच दिसेल.