शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

रोजगार उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:05 IST

सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : नवेगावबांध येथे रोजगार व मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान (नागपूर) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजित रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बाटीर्चे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, सडक-अर्जुनी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, कविता रंगारी, पदमा परतेकी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, देवेंद्र टेंभरे, विजय बिसेन, मधुकर मरस्कोल्हे, लक्ष्मीकांत धानगाये, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, प्राचार्य बलवीर, गजानन डोंगरवार, रतन वासनिक मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजे. या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे बार्टीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले. कणसे यांनी, या मेळाव्याच्या माध्यमातून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे असे सांगितले.याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्राम उसगाव येथील रुपाली मेश्राम हिने वाघाशी मुकाबला करुन प्राण वाचविण्याचे शौर्य दाखविल्याबद्दल त्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीमध्ये समता दूत पदावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी मांडले. संचालन रत्नाकर बोरकर यांनी केले. आभार बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे यांनी मानले.विविध विभागांचे स्टॉल्सया मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, बँकींग, फायनान्स, मॅन्यूफॅक्चरींग, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, हॉस्पीटॅलिटी, एव्हीएशन व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्यचा स्टॉल लावण्यात आला होता. लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.