शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By admin | Updated: May 17, 2015 01:52 IST

नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात ...

गोंदिया : नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात २७ आगजळीच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या आगजळीत कित्येकांच्या रोजीरोटीवर गाज पडली असून कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दीड कोटींच्या वर मालमत्ता जळून खास झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तीशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते. तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानी बाळगली तरिही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात आग या तत्वाकडे लक्ष दिल्यास सन २०१५ च्या सुरूवातीच्या साडेचार महिन्यांत तब्बल २७ घटना घडल्या आहेत. आगजळीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या २७ घटनांतील १५ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. वर्षाच्या सुरूवातीच्या फक्त साडेचार वर्षांतील हा आकडा बघता जिल्हा हादरून गेला आहे. यात आगजळींच्या घटनांची महिन्यानुसार आकडेवारी बघितल्यास जानेवारी महिन्यात सहा, फेब्रुवारी महिन्यात तीन, मार्च महिन्यात ४, एप्रिल महिन्यात सात तर सुरे असलेल्या मे महिन्याच्या १५ दिवसांत सात घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांना बघता हे वर्ष खरोखरच काहींना भाग्याचे लागले असेल यात शंका नाही. मात्र आगजळींच्या घटनांत आपले सर्व काही गमावून बसलेल्यांना विचारल्यास त्यांच्या डोळ््यात अश्रूच दिसणार. (शहर प्रतिनिधी)घर जळण्याच्या घटना अधिक आगजळी या घटनांत १५ घटना शहराबाहेरील आहेत. असून त्यातही घर व गोठे जळण्याच्या १३ घटना घडल्या आहेत. तर अन्य घटनांत गोदाम, पानटपऱ्या दुकान आदिंचा समावेश आहे. यामुळेच या अग्नितांडवात कित्येकांच्या घरावरचे छत हिरावल्या गेले. तर कित्येकांच्या रोजीरोजीवरच गाज पडल्याचे दिसून येते. कारण जानेवारी महिन्यांतील घटनांत तीन लाख १० हजार रूपये, फेब्रुवारी महिन्यात तीन लाख ७५ हजार रूपये, मार्च महिन्यात सात लाख ५० हजार रूपये, एप्रिल महिन्यात २४ लाख ५० हजार रूपये तर मे महिन्यात एक कोटी पाच लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता जळून खाल झाली आहे. विशेष म्हणजे यातही काही घटनांतील झालेल्या नुकसानीची नोंद नाही. अन्यथा नुकसानीची ही आकडेवारी आणखी वाढणार.