शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By admin | Updated: May 17, 2015 01:52 IST

नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात ...

गोंदिया : नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात २७ आगजळीच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या आगजळीत कित्येकांच्या रोजीरोटीवर गाज पडली असून कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दीड कोटींच्या वर मालमत्ता जळून खास झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तीशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते. तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानी बाळगली तरिही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात आग या तत्वाकडे लक्ष दिल्यास सन २०१५ च्या सुरूवातीच्या साडेचार महिन्यांत तब्बल २७ घटना घडल्या आहेत. आगजळीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या २७ घटनांतील १५ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. वर्षाच्या सुरूवातीच्या फक्त साडेचार वर्षांतील हा आकडा बघता जिल्हा हादरून गेला आहे. यात आगजळींच्या घटनांची महिन्यानुसार आकडेवारी बघितल्यास जानेवारी महिन्यात सहा, फेब्रुवारी महिन्यात तीन, मार्च महिन्यात ४, एप्रिल महिन्यात सात तर सुरे असलेल्या मे महिन्याच्या १५ दिवसांत सात घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांना बघता हे वर्ष खरोखरच काहींना भाग्याचे लागले असेल यात शंका नाही. मात्र आगजळींच्या घटनांत आपले सर्व काही गमावून बसलेल्यांना विचारल्यास त्यांच्या डोळ््यात अश्रूच दिसणार. (शहर प्रतिनिधी)घर जळण्याच्या घटना अधिक आगजळी या घटनांत १५ घटना शहराबाहेरील आहेत. असून त्यातही घर व गोठे जळण्याच्या १३ घटना घडल्या आहेत. तर अन्य घटनांत गोदाम, पानटपऱ्या दुकान आदिंचा समावेश आहे. यामुळेच या अग्नितांडवात कित्येकांच्या घरावरचे छत हिरावल्या गेले. तर कित्येकांच्या रोजीरोजीवरच गाज पडल्याचे दिसून येते. कारण जानेवारी महिन्यांतील घटनांत तीन लाख १० हजार रूपये, फेब्रुवारी महिन्यात तीन लाख ७५ हजार रूपये, मार्च महिन्यात सात लाख ५० हजार रूपये, एप्रिल महिन्यात २४ लाख ५० हजार रूपये तर मे महिन्यात एक कोटी पाच लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता जळून खाल झाली आहे. विशेष म्हणजे यातही काही घटनांतील झालेल्या नुकसानीची नोंद नाही. अन्यथा नुकसानीची ही आकडेवारी आणखी वाढणार.