शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रानटी पशूंचा बंदोबस्त करा

By admin | Updated: October 6, 2016 01:05 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन : बरबसपुरा येथील शेतकरी त्रस्त काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली. माकडांमुळे घरांची व भाजीपाला पिकांची नासाडी होत असून यावर वन विभागाने उपाययोजना करावी, याकरिता सरपंच ममता लिचडे यांनी शेतकऱ्यांसह जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिले. बरबसपुरा येथील शेतकरी रानडुकरांनी केलेल्या धानपिकांच्या नासाडीने त्रासले आहेत. नुकसान भरपाई दावे करताना वनविभागाद्वारे त्रासदायी व जाचक अटी लादल्या जातात. यावर चर्चा करण्याकरिता व वन्यप्राण्यांची समस्या संबंधात जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या उपस्थितीत सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांची भेट घेतली व निवेदन दिले. दिवसेंदिवस रानडुकरांची व माकडांची समस्या वाढत चालली असून आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेवून रोकथाम करण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याला कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी दुजोरा दिला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी रानडुकराला मारण्याची परवानगी मागितल्यास आपण देवू शकतो, मात्र मारायचे कसे ते आपण ठरवावे आणि कायदा पालनाची काळजी घ्यावी, असे सांगितले. त्रासदायी समस्यांमुळे नुकसान भरपाईचे दावे करणे अनेक शेतकरी टाळतात. काही शेतकरी दावे सादर करतात, तेव्हा कर्मचारी रूपयांची मागणी करतात. स्वाक्षरीसाठी शेतकऱ्यांना त्रास देतात, अशी समस्या जि.प. सदस्य डोंगरे व सरपंच ममता लिचडे यांच्यासह शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमक्ष मांडली. यावर कृषी विभागाला वगळण्याचे आदेश वन विभागाने दिले असून नुकसान भरपाई दाव्यांना विलंब होणार नाही, हे यामागील मुख्य उद्देश्य असल्याचेही राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी सांगितले. वनविभागाने रानडुक्कर आणि माकडांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर शेतकऱ्यांचे शेतात व नागरिकांचे घरी राहणे भविष्यात कठिण होईल, असे जि.प. सदस्य डोंगरे यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीत शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत असल्याचे सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सांगितले. वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम आणि क्षेत्रीय वनाधिकारी व्ही.सी. मेश्राम यांनी उपस्थितांना सांगीतले की, आमच्याकडे वन आणि प्राणी यांच्या सरंक्षणाची जवाबदारी असल्याने आम्हाला सर्वदूर परिस्थिती माहिती असली तरी काही करू शकत नाही. याकरिता राजकीय लोकसेवकांनी या समस्या शासनासमक्ष ठेवाव्या. त्यावर शासन उपाययोजना ठरवू शकतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिष्टमंडळात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सरपंच ममता लिचडे, अशोक लिचडे, माणिकराम कटरे, बाळू पारधी, नेतराम माने, श्याम नागपुरे, उमाशंकर लिल्हारे व बरबसपुरा येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)अनुसूची ३ मधून वगळणे गरजेचे रानडुकर आणि माकड अनुसूची-३ मध्ये मोडतात. रानडुकरांची उत्पत्ती फार मोठी असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. माणसापेक्षा हिंसक पशूंची किंमत अधिक का? असा प्रश्न मनोज डोंगरे आणि ममता लिचडे यांनी उपस्थित केला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी सांगीतले की, वन्यप्राणी हे अनुसूची ३ मध्ये सरंक्षित असल्याने त्यांना मारण्याची परवानगी नाही. या प्राण्यांना अनुसूची तीनमधून काढण्यात आले आणि सरसकट मारण्याची परवानगी देण्यात आली तर हे शक्य आहे. परंतु हे अधिकार शासनाला असल्याने लोकप्रतिधिंनी शासनाच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाच्या व विभागाच्या बंधनात असल्याने धानपीक व इतर नासाडीच्या नुकसान भरपाई संबंधात दावे नियमानुसार मंजुरीसाठी पाठविले जातील. अधिक त्रास होणार नाही, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.बंदोबस्तासाठी तीन उपाय रानडुकरांच्या बंदोबस्ताकरिता बाजारात राऊंड बॉक्स उपलब्ध आहेत. हे यंत्रामुळे शेतात वनराजासह अनेक ध्वनी निर्माण करीत असल्याने रानडुकरे त्या परिसरात येत नाहीत. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असल्याचे दिसून येत नाही. याची किंमत दोन हजारापासून १८ हजारापर्यंत आहे. गरजू शेतकऱ्यांना साऊंड मेमरीमध्ये वनविभागातून आवाज उपलब्ध करून देता येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस.कदम यांनी सांगितले. दुसरा उपाय म्हणून त्यांनी सांगितले की, लाल मिरची लावावी. त्यात रॉकेल ओतून शेतात जाळल्यास त्याची तिरवट धूर परिसरात पसरेल. रानडुकर ही खालमानी असल्याने धुरामुळे शेतात येणार नाही. परंतु हे प्रभावशील होईलच, असे म्हणता येत नाही, असेही ते म्हणाले.