शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

रानटी पशूंचा बंदोबस्त करा

By admin | Updated: October 6, 2016 01:05 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन : बरबसपुरा येथील शेतकरी त्रस्त काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली. माकडांमुळे घरांची व भाजीपाला पिकांची नासाडी होत असून यावर वन विभागाने उपाययोजना करावी, याकरिता सरपंच ममता लिचडे यांनी शेतकऱ्यांसह जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिले. बरबसपुरा येथील शेतकरी रानडुकरांनी केलेल्या धानपिकांच्या नासाडीने त्रासले आहेत. नुकसान भरपाई दावे करताना वनविभागाद्वारे त्रासदायी व जाचक अटी लादल्या जातात. यावर चर्चा करण्याकरिता व वन्यप्राण्यांची समस्या संबंधात जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या उपस्थितीत सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांची भेट घेतली व निवेदन दिले. दिवसेंदिवस रानडुकरांची व माकडांची समस्या वाढत चालली असून आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेवून रोकथाम करण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याला कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी दुजोरा दिला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी रानडुकराला मारण्याची परवानगी मागितल्यास आपण देवू शकतो, मात्र मारायचे कसे ते आपण ठरवावे आणि कायदा पालनाची काळजी घ्यावी, असे सांगितले. त्रासदायी समस्यांमुळे नुकसान भरपाईचे दावे करणे अनेक शेतकरी टाळतात. काही शेतकरी दावे सादर करतात, तेव्हा कर्मचारी रूपयांची मागणी करतात. स्वाक्षरीसाठी शेतकऱ्यांना त्रास देतात, अशी समस्या जि.प. सदस्य डोंगरे व सरपंच ममता लिचडे यांच्यासह शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमक्ष मांडली. यावर कृषी विभागाला वगळण्याचे आदेश वन विभागाने दिले असून नुकसान भरपाई दाव्यांना विलंब होणार नाही, हे यामागील मुख्य उद्देश्य असल्याचेही राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी सांगितले. वनविभागाने रानडुक्कर आणि माकडांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर शेतकऱ्यांचे शेतात व नागरिकांचे घरी राहणे भविष्यात कठिण होईल, असे जि.प. सदस्य डोंगरे यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीत शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत असल्याचे सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सांगितले. वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम आणि क्षेत्रीय वनाधिकारी व्ही.सी. मेश्राम यांनी उपस्थितांना सांगीतले की, आमच्याकडे वन आणि प्राणी यांच्या सरंक्षणाची जवाबदारी असल्याने आम्हाला सर्वदूर परिस्थिती माहिती असली तरी काही करू शकत नाही. याकरिता राजकीय लोकसेवकांनी या समस्या शासनासमक्ष ठेवाव्या. त्यावर शासन उपाययोजना ठरवू शकतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिष्टमंडळात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सरपंच ममता लिचडे, अशोक लिचडे, माणिकराम कटरे, बाळू पारधी, नेतराम माने, श्याम नागपुरे, उमाशंकर लिल्हारे व बरबसपुरा येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)अनुसूची ३ मधून वगळणे गरजेचे रानडुकर आणि माकड अनुसूची-३ मध्ये मोडतात. रानडुकरांची उत्पत्ती फार मोठी असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. माणसापेक्षा हिंसक पशूंची किंमत अधिक का? असा प्रश्न मनोज डोंगरे आणि ममता लिचडे यांनी उपस्थित केला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी सांगीतले की, वन्यप्राणी हे अनुसूची ३ मध्ये सरंक्षित असल्याने त्यांना मारण्याची परवानगी नाही. या प्राण्यांना अनुसूची तीनमधून काढण्यात आले आणि सरसकट मारण्याची परवानगी देण्यात आली तर हे शक्य आहे. परंतु हे अधिकार शासनाला असल्याने लोकप्रतिधिंनी शासनाच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाच्या व विभागाच्या बंधनात असल्याने धानपीक व इतर नासाडीच्या नुकसान भरपाई संबंधात दावे नियमानुसार मंजुरीसाठी पाठविले जातील. अधिक त्रास होणार नाही, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.बंदोबस्तासाठी तीन उपाय रानडुकरांच्या बंदोबस्ताकरिता बाजारात राऊंड बॉक्स उपलब्ध आहेत. हे यंत्रामुळे शेतात वनराजासह अनेक ध्वनी निर्माण करीत असल्याने रानडुकरे त्या परिसरात येत नाहीत. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असल्याचे दिसून येत नाही. याची किंमत दोन हजारापासून १८ हजारापर्यंत आहे. गरजू शेतकऱ्यांना साऊंड मेमरीमध्ये वनविभागातून आवाज उपलब्ध करून देता येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस.कदम यांनी सांगितले. दुसरा उपाय म्हणून त्यांनी सांगितले की, लाल मिरची लावावी. त्यात रॉकेल ओतून शेतात जाळल्यास त्याची तिरवट धूर परिसरात पसरेल. रानडुकर ही खालमानी असल्याने धुरामुळे शेतात येणार नाही. परंतु हे प्रभावशील होईलच, असे म्हणता येत नाही, असेही ते म्हणाले.