शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देवरी-नवेगाव उपसा योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:35 IST

तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देराज्यपालांची हिरवी झेंडी : १० हजार हेक्टरला होणार सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील देवरी-नवेगाव उपसा या महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनेला महाराष्ट्र राज्यपाल विद्यासागर राव यांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे या परिसतील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मोठी मदत होणार आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन योजनेला राज्यपालांची मंजुरी मिळवून घेतली.शेतकºयांची सिंचनाची समस्या दूर व्हावी, त्यांना दोन्ही हंगामात उत्पन्न घेता यावे, यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी दीडशे कोटी रुपयांच्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि.२२) रोजी संबंधित विभागाच्या अधिकाºयांची नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत आ.अग्रवाल यांनी राज्यपालांना विनंती केली गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीचे पाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहुन जाते. याच वाहुन जाण्याऱ्या पाण्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी केल्यास शेतकºयांना मोठी मदत होईल. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील २० गावांतील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होईल. शिवाय १० हजारावर शेतकरी कुटुंबाना याची मदत होणार असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.अग्रवाल यांच्या आग्रहानंतर योजनेचे महत्त्व ओळखत राज्यपाल विद्यासागर राव यांनी देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला अंतीम मंजुरी दिली. गोंदिया तालुक्यातील काही भाग केवळ बाघ नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नवीन उपसा सिंचन योजना झाल्यास शेतकऱ्यांना त्याची मोठी मदत होणार होती. हीच बाब ओळखून आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. विशेष म्हणजे मागील पाच ते सहा वर्षाच्या कालावधीत प्रथमच उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी रजेगाव-काटी, तेढवा-सिवणी व डांर्गोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून दिली. देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिल्याबद्दल राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या उपसा योजनेला मंजुरी मिळाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.