शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

१६ कर्मचाऱ्यांना पाठविले एओपीत

By admin | Updated: February 13, 2017 00:17 IST

जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर

नक्षलवाद्यांच्या हालचालींवर ठेवणार नजर : सी-६० जवानांसोबत करणार सर्च आॅपरेशन गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी देवरी येथील पोलीस उपमुख्यालयात कार्यरत १६ कर्मचाऱ्यांना १० फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षकांनी एओपींमध्ये पाठविले आहे. यात मगरडोह एओपींमध्ये सात जवान तर भरनोली एओपीत नऊ जवानांना पाठविले आहे. गोंदिया अति संवेदनशील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिवाय जिल्ह्यातील जुना इतिहास बघता नक्षल्यांच्या कारवायांतून जिल्हा नेहमीच त्यांच्या टार्गेटवर असल्याचेही स्पष्ट दिसून येते. नक्षल्यांकडून संधी मिळेल तेव्हा काहीना काही कारवाया जिल्ह्यात केल्या जातात. अशात मोठ्या प्रमाणात नुकसान व जिवीतहानीही भोगावी लागते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या कारवायांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या या कारवायांवर सातत्याने नजर ठेवून त्यांना वेळीच मुठमाती देणे अधिक गरजेचे आहे. अशात छत्तीगड व महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या नक्षल कारवायांना पाहून जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच सी-६० कमांडोसोबत नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी देवीर पोलीस उप मुख्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) येथे संलग्न केले आहे. यात पोलीस हवालदार माधवराव बन्सोड (बक्कल नं.७३१), उरकुडा राऊत (ब.नं.२७७), मधुकर वैद्य (ब.नं.१०५९), पोलीस नायक विनादे कोल्हारे (ब.नं.१२४१), अजय सव्वालाखे (ब.नं.११४१), राजू वनवे (ब.नं.११८३), इर्श्या वाघधरे (ब.नं.१२७९), दुर्योधन मडावी (ब.नं.१२५५), गोपीचंद इस्कापे (ब.नं.१२३६) यांना शसस्त्र दूरक्षेत्र भरनोली येथे पाठविण्यात आले आहे. तर पोलिस हवालदार सुखदेव केंद्रे (ब.नं.१३९५), रमेश कुंभलकर (ब.नं.१०११), पोलीस नायक सुरेश चव्हाण (ब.नं.१५८४), धर्मेंद्र परतेकी (ब.नं.१९६७),सहाय्यक फौजदार चालक प्रदीप पेटकुले (ब.नं.७९१), लक्ष्मीनारायण मिश्रा (ब.नं.७६८) व शैलेश राऊत (ब.नं.१३५४) यांना शसस्त्र दूरक्षेत्र मगरडोह येथे पाठविण्यात आले केले आहे. सदर कर्मचारी राज्य राखी पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नक्षल विरोधी अभियान राबवतील. (तालुका प्रतिनिधी) सर्चिंग सातत्याने सुरूच नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातही नक्षलवाद्यांकडून घातपात करण्यासाठी कसलीही कसर सोडली जात नाही. भूसुरूंगस्फोट घडविणे, काळे झेंडे लावणे, पत्रके टाकणे, भारत सरकारच्या विरूद्ध कारवाया करण्याचे हिंसक काम नक्षलवाद्यांकडून करण्यात येते. त्यांचे मनसुबे वेळीच हाणून पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून वेळीच उपाय योजना केल्या जातात. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून वेळीच त्यांच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी पोलिसांना सातत्याने जंगलात सर्च मोहीम राबवावी लागत आहे.