शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

१६ कर्मचाऱ्यांना पाठविले एओपीत

By admin | Updated: February 13, 2017 00:17 IST

जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर

नक्षलवाद्यांच्या हालचालींवर ठेवणार नजर : सी-६० जवानांसोबत करणार सर्च आॅपरेशन गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्याने येथे पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे नलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी देवरी येथील पोलीस उपमुख्यालयात कार्यरत १६ कर्मचाऱ्यांना १० फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षकांनी एओपींमध्ये पाठविले आहे. यात मगरडोह एओपींमध्ये सात जवान तर भरनोली एओपीत नऊ जवानांना पाठविले आहे. गोंदिया अति संवेदनशील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिवाय जिल्ह्यातील जुना इतिहास बघता नक्षल्यांच्या कारवायांतून जिल्हा नेहमीच त्यांच्या टार्गेटवर असल्याचेही स्पष्ट दिसून येते. नक्षल्यांकडून संधी मिळेल तेव्हा काहीना काही कारवाया जिल्ह्यात केल्या जातात. अशात मोठ्या प्रमाणात नुकसान व जिवीतहानीही भोगावी लागते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या कारवायांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या या कारवायांवर सातत्याने नजर ठेवून त्यांना वेळीच मुठमाती देणे अधिक गरजेचे आहे. अशात छत्तीगड व महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या नक्षल कारवायांना पाहून जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी तसेच सी-६० कमांडोसोबत नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी देवीर पोलीस उप मुख्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) येथे संलग्न केले आहे. यात पोलीस हवालदार माधवराव बन्सोड (बक्कल नं.७३१), उरकुडा राऊत (ब.नं.२७७), मधुकर वैद्य (ब.नं.१०५९), पोलीस नायक विनादे कोल्हारे (ब.नं.१२४१), अजय सव्वालाखे (ब.नं.११४१), राजू वनवे (ब.नं.११८३), इर्श्या वाघधरे (ब.नं.१२७९), दुर्योधन मडावी (ब.नं.१२५५), गोपीचंद इस्कापे (ब.नं.१२३६) यांना शसस्त्र दूरक्षेत्र भरनोली येथे पाठविण्यात आले आहे. तर पोलिस हवालदार सुखदेव केंद्रे (ब.नं.१३९५), रमेश कुंभलकर (ब.नं.१०११), पोलीस नायक सुरेश चव्हाण (ब.नं.१५८४), धर्मेंद्र परतेकी (ब.नं.१९६७),सहाय्यक फौजदार चालक प्रदीप पेटकुले (ब.नं.७९१), लक्ष्मीनारायण मिश्रा (ब.नं.७६८) व शैलेश राऊत (ब.नं.१३५४) यांना शसस्त्र दूरक्षेत्र मगरडोह येथे पाठविण्यात आले केले आहे. सदर कर्मचारी राज्य राखी पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नक्षल विरोधी अभियान राबवतील. (तालुका प्रतिनिधी) सर्चिंग सातत्याने सुरूच नक्षलवाद्यांचे रेस्टझोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातही नक्षलवाद्यांकडून घातपात करण्यासाठी कसलीही कसर सोडली जात नाही. भूसुरूंगस्फोट घडविणे, काळे झेंडे लावणे, पत्रके टाकणे, भारत सरकारच्या विरूद्ध कारवाया करण्याचे हिंसक काम नक्षलवाद्यांकडून करण्यात येते. त्यांचे मनसुबे वेळीच हाणून पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून वेळीच उपाय योजना केल्या जातात. नक्षलवाद्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून वेळीच त्यांच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी पोलिसांना सातत्याने जंगलात सर्च मोहीम राबवावी लागत आहे.