शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कुठलाही कायदा संविधानाशी सुसंगत असला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : संविधान साक्षर ग्राम सांगता समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतीय संविधान म्हणजे घटना हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. भारतात तयार होणारा कुठलाही कायदा हा भारतीय संविधानाशी सुसंगतच असला पाहिजे असे बंधन आहे. तो तसा तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयला आहे. प्रत्यक्ष संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. त्या दिवसापासून प्रजा सत्तेत आली. म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो. मुलभुत अधिकारावर जर गदा आली तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने आ. मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, लक्ष्मीकांत धानगाये, कविता रंगारी, दयानंद कोरे, खेमराज भेंडारकर, आशा ठाकरे, गौतमा खोब्रागडे, योगिता ब्राम्हणकर, साजन वासनिक उपस्थित होते.दीप प्रज्वलन व थोरपुरूषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. गंगाधर परशुरामकर यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी करुन खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना केली. संविधानाची जनजागृती होणे काळाची गरज आहे.डॉ. मंगेश वानखेडे यांनी संविधान साक्षर ग्राम उपक्र म प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क अधिकार व कर्तव्य जाणून घेण्यास मदत झाली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रसार समतादूत प्रत्येक गावात करीत असतात. प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.संविधान साक्षर ग्राम उपक्रम घेण्यामागील उद्देश प्रत्येक नागरिकांना संविधानाची माहिती व्हावी,प्रत्येक योजनाची माहिती समतादूतामार्फत नागरिकांना मिळावी. या उद्देशाने हा उपक्र म राबविण्यात आल्याची माहिती पंकज माने यांनी दिली. उपक्रमातंर्गत राज्यातील १०० गावे संविधान साक्षर करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन समतादूत संदेश ऊके यांनी केले तर आभार शिवाजी गहाणे यांनी मानले.या कार्यक्रमांची जनजागृतीसमतादूतामार्फत संविधान वाचन, अंधश्रद्धा निर्मूलन,वैज्ञानिक जाणीव जागृती, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर, महिला मेळावा,सामिजक न्याय विभागाच्या योजना, कृषी विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यात आला.संविधान प्रास्ताविकेचे वाटप, रोजगार संधी मेळावा या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक समाजातील घटक, महिला, पुरूष, विद्यार्थी, पदाधिकारी यांना लोकशाही संविधान याबद्दल माहिती देण्यात आली.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले