शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुठलाही कायदा संविधानाशी सुसंगत असला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : संविधान साक्षर ग्राम सांगता समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतीय संविधान म्हणजे घटना हा भारतातील सर्वोच्च कायदा आहे. भारतात तयार होणारा कुठलाही कायदा हा भारतीय संविधानाशी सुसंगतच असला पाहिजे असे बंधन आहे. तो तसा तर तो कायदा रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयला आहे. प्रत्यक्ष संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. त्या दिवसापासून प्रजा सत्तेत आली. म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतो. मुलभुत अधिकारावर जर गदा आली तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने आ. मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, लक्ष्मीकांत धानगाये, कविता रंगारी, दयानंद कोरे, खेमराज भेंडारकर, आशा ठाकरे, गौतमा खोब्रागडे, योगिता ब्राम्हणकर, साजन वासनिक उपस्थित होते.दीप प्रज्वलन व थोरपुरूषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. गंगाधर परशुरामकर यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी करुन खºया अर्थाने लोकशाहीची स्थापना केली. संविधानाची जनजागृती होणे काळाची गरज आहे.डॉ. मंगेश वानखेडे यांनी संविधान साक्षर ग्राम उपक्र म प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क अधिकार व कर्तव्य जाणून घेण्यास मदत झाली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रसार समतादूत प्रत्येक गावात करीत असतात. प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.संविधान साक्षर ग्राम उपक्रम घेण्यामागील उद्देश प्रत्येक नागरिकांना संविधानाची माहिती व्हावी,प्रत्येक योजनाची माहिती समतादूतामार्फत नागरिकांना मिळावी. या उद्देशाने हा उपक्र म राबविण्यात आल्याची माहिती पंकज माने यांनी दिली. उपक्रमातंर्गत राज्यातील १०० गावे संविधान साक्षर करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन समतादूत संदेश ऊके यांनी केले तर आभार शिवाजी गहाणे यांनी मानले.या कार्यक्रमांची जनजागृतीसमतादूतामार्फत संविधान वाचन, अंधश्रद्धा निर्मूलन,वैज्ञानिक जाणीव जागृती, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर, महिला मेळावा,सामिजक न्याय विभागाच्या योजना, कृषी विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यात आला.संविधान प्रास्ताविकेचे वाटप, रोजगार संधी मेळावा या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक समाजातील घटक, महिला, पुरूष, विद्यार्थी, पदाधिकारी यांना लोकशाही संविधान याबद्दल माहिती देण्यात आली.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले