शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मतदारसंघाच्या मागणीवरुन नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजून घेणारे काही स्वंघोषीत पुढारी कार्यकर्त्यांना पुढे करुन विरोध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.गोंदिया जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला होते. तर तिरोडा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या वाट्याला होता. मात्र २०१४ निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली होती. त्यामुळे अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा, आमगाव विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी राष्टÑवादी काँग्रेसकडून अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या मतदारसंघासाठी आग्रह धरला जात आहे. त्यात काही गैर नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावरुन कुठलेच मतभेद नाहीत. कारण अद्याप या चारही मतदारसंघात जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही.त्यामुळे या विरोध किवा समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजणाऱ्यांनी यावरुन विरोध करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे नावे पुढे करुन स्वत: मात्र मागे राहण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे यावर मतदारच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच हे नाट्य कशाला असा सूर देखील आवळला जात आहे. दरम्यान यासर्व प्रकाराची या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय दखल घेतात हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पाच वर्षांत कुठली कामगीरीविधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षांतून इच्छूकांची भाऊ गर्दी वाढली आहे. जो तो उमेदवारीसाठी दावा करीत आहे. ज्या इच्छुकांची नावे पक्षातील कार्यकर्त्यांनी कधीच ऐकली नाही त्यांची सुध्दा नावे पुढे येत आहे. मागील पाच वर्षांत कधीही मतदारांच्या संर्पकात नसलेले आणि पक्षासाठी कुठलीही कामगीरी न करणारे सुध्दा उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक