शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र योजना बनगाव योजनेसोबत जोडण्याचा घाट

By admin | Updated: May 18, 2014 23:40 IST

आजघडीला आमगाववासीयांना स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ग्रामपंचायतने येथील वाढीव पाणी पुरवठा योजना बनगाव प्रादेशीक पाणी

 आमगाव : आजघडीला आमगाववासीयांना स्वंतत्र पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु ग्रामपंचायतने येथील वाढीव पाणी पुरवठा योजना बनगाव प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेला जोडण्याचा घाट रचला आहे. अशात येथील नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळविण्याचा प्रकार केला जात असल्याने येथील ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्यांप्रती नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या नाराजगीचा कधीही स्फोट आंदोलनाच्या माध्यमातून होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन जलकुुंभ व जलशुद्धीकरण यंत्राची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे. या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेद्वारे येथील १५ हजार नागरिकांना व्यवस्थीतपणे पाणी पुरवठा सुरु आहे. एवढेच नव्हेतर वाढत्या लोकसंखेला लक्षात घेता शासनाकडून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत दोन कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू करुन येथील नागरिकांसाठी संजीवनी देण्यात आली. परंतु ग्रामपंचायतच्या व स्थानिक जनप्रतिनिधींच्या लालसेमुळे ही योजना आॅक्सिजनवर असलेल्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जोडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. या संदर्भात नागरिकांना दिशाभूल करुन ठरावही संमत करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ४८ गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून रेंगाळत पाणी पुरवठा करित आहे. या योजनेत समाविष्ट गावांनी पाणी मिळत नसल्याने यातून माघार घेतली. तर अनेक गावातील पाणीपट्टी वसुली होत नसल्याने व जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेच्या उदासिन धोरणामुळे योजना अखेरची घटका मोजत आहे. या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत फक्त उर्वरीत २८ गावांना पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु वारंवार जिल्हा परिषदे व स्थानिक प्रशासनामुळे या योजनेचे थकीत बील ५० लाख रुपयांपर्यंत पोहचत असते. विद्युत भरणा व योजनेवरील खर्च भागत नसल्याने ही योजना वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे. या योजनेचे अपयश लपविण्यासाठी आमगाव ग्रामपंचायत व स्थानिक जनप्रतिनिधींनी आमगावच्या स्वतंत्र योजनेला बनगाव पाणी पुरवठा योजनेत समायोजीत केले. यामुळे मात्र आमगाववासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. सदर योजनेसंदर्भात निर्णय क्षमता नसणार्‍या ग्रामपंचायतला विर्सजीत करून पदाकिधारी व सदस्यांनी राजीनामे सोपवावे अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)