शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वन्यजीव विभागाच्या अनास्थेने पर्यटक वंचित

By admin | Updated: May 7, 2014 18:43 IST

जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही.

गोंदिया : जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही. वन्यजीव विभागाकडून पाहिजे तसा प्रचार-प्रसार होत नसल्याने पर्यटक विभागाकडून पुरविण्यात येणार्‍या सुविधांपासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला वरदान आहे.

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याला प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने जिल्ह्याची देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच विदेशी पर्यटकसुद्धा या व्याघ्र प्रकल्पाकडे आकर्षित होत आहेत. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनात भर पडलेली नसल्याचे दिसते. त्यामाचे मुख्य कारण म्हणजे येथील वन्यजीव विभागाची अनास्था असल्याचे बोलले जात आहे. त्याचे असे की, १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी (गणतंत्र दिन) व १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी व्याघ्र प्रकल्प म्हणा वा अभयारण्यात नि:शुल्क सफारीची सुविधा पुरविण्याचे शासन आदेश आहेत. या दिवशी पर्यटकांना वन विभागाकडून निशुल्क प्रवेश दिला जातो. त्यासाठी वाहनांची सोयही करण्यात येते. जंगल सफारी करवून त्यांना प्रवेशद्वारावर आणून सोडले जाते. यंदा १ मे रोजी वन्यजीव विभागाने पर्यटनाला चालना मिळावी व पर्यटकांची कोंडी होऊ नये या उद्देशातून नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे सडक अर्जुनी तालुक्यातील बकी व पितांबरटोला हे दोन नवे प्रवेशद्वार सुरू केले. तसेच या दोन्ही प्रवेशद्वारांवरून निशुल्क प्रवेशाची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करवून दिली. यासाठी बकी प्रवेशद्वारवरून ११ तर पितांबरटोला प्रवेशद्वारवरून आठ वाहन सोडण्यात आले. यामुळे येथे आलेल्या मोजक्याच पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता आला.

विशेष म्हणजे, वन्यजीव विभागाकडून दोन नवे प्रवेशद्वार सुरू करण्यात येत असल्याबाबत तसेच महाराष्ट्र दिनी पर्यटकांसाठी निशुल्क प्रवेशाची सुविधा उपलब्ध करवून दिली जाणार असल्याबाबत प्रचार व प्रसिद्धी केलीच नाही. एवढेच नव्हे तर वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही यासाठी साधी बातमीही पुरविण्यात आली नाही. यामुळे पर्यटकांना वनविभागाकडून पुरविण्यात येत असलेल्या या सुविधेबाबत माहिती मिळाली नाहीच. परिणामी मोजक्याच लोकांना निशुल्क सफारीचा आनंद लुटता आला. ही ठरावीक या घटनेपुरतीच मर्यादीत बाब नाही, मात्र वन्यजीव विभाग नेहमीच प्रचार-प्रसिद्धीच्या बाबतीत फेल ठरत असल्याने निसर्गाने दिलेल्या वरदानाचा आनंद लुटण्यापासून मात्र पर्यटक वंचित राहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)

नियमानुसार महाराष्ट्र दिनी नि:शुल्क सफारीची सुविधा देण्यात आली. यासाठी आमच्या वेबसाईटवर माहिती टाकण्यात आली आहे. वृत्तपत्रांमधून मात्र याबाबतची प्रसिद्ध करण्यात आली नाही. - एल.एल.ठवरे वन्यजीव संरक्षक, गोंदिया