शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वन्यजीव विभागाच्या अनास्थेने पर्यटक वंचित

By admin | Updated: May 7, 2014 18:43 IST

जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही.

गोंदिया : जिल्ह्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदान लाभलेले आहे. मात्र येथील वन्यजीव विभागाच्या अनास्थेमुळे प्रकल्पांत पर्यटनाला पाहीजे तसे सुगीचे दिवस अजूनही आलेले नाही. वन्यजीव विभागाकडून पाहिजे तसा प्रचार-प्रसार होत नसल्याने पर्यटक विभागाकडून पुरविण्यात येणार्‍या सुविधांपासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला वरदान आहे.

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याला प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने जिल्ह्याची देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच विदेशी पर्यटकसुद्धा या व्याघ्र प्रकल्पाकडे आकर्षित होत आहेत. असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनात भर पडलेली नसल्याचे दिसते. त्यामाचे मुख्य कारण म्हणजे येथील वन्यजीव विभागाची अनास्था असल्याचे बोलले जात आहे. त्याचे असे की, १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी (गणतंत्र दिन) व १ मे (महाराष्ट्र दिन) या दिवशी व्याघ्र प्रकल्प म्हणा वा अभयारण्यात नि:शुल्क सफारीची सुविधा पुरविण्याचे शासन आदेश आहेत. या दिवशी पर्यटकांना वन विभागाकडून निशुल्क प्रवेश दिला जातो. त्यासाठी वाहनांची सोयही करण्यात येते. जंगल सफारी करवून त्यांना प्रवेशद्वारावर आणून सोडले जाते. यंदा १ मे रोजी वन्यजीव विभागाने पर्यटनाला चालना मिळावी व पर्यटकांची कोंडी होऊ नये या उद्देशातून नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे सडक अर्जुनी तालुक्यातील बकी व पितांबरटोला हे दोन नवे प्रवेशद्वार सुरू केले. तसेच या दोन्ही प्रवेशद्वारांवरून निशुल्क प्रवेशाची सुविधा पर्यटकांना उपलब्ध करवून दिली. यासाठी बकी प्रवेशद्वारवरून ११ तर पितांबरटोला प्रवेशद्वारवरून आठ वाहन सोडण्यात आले. यामुळे येथे आलेल्या मोजक्याच पर्यटकांना या सुविधेचा लाभ घेता आला.

विशेष म्हणजे, वन्यजीव विभागाकडून दोन नवे प्रवेशद्वार सुरू करण्यात येत असल्याबाबत तसेच महाराष्ट्र दिनी पर्यटकांसाठी निशुल्क प्रवेशाची सुविधा उपलब्ध करवून दिली जाणार असल्याबाबत प्रचार व प्रसिद्धी केलीच नाही. एवढेच नव्हे तर वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही यासाठी साधी बातमीही पुरविण्यात आली नाही. यामुळे पर्यटकांना वनविभागाकडून पुरविण्यात येत असलेल्या या सुविधेबाबत माहिती मिळाली नाहीच. परिणामी मोजक्याच लोकांना निशुल्क सफारीचा आनंद लुटता आला. ही ठरावीक या घटनेपुरतीच मर्यादीत बाब नाही, मात्र वन्यजीव विभाग नेहमीच प्रचार-प्रसिद्धीच्या बाबतीत फेल ठरत असल्याने निसर्गाने दिलेल्या वरदानाचा आनंद लुटण्यापासून मात्र पर्यटक वंचित राहत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)

नियमानुसार महाराष्ट्र दिनी नि:शुल्क सफारीची सुविधा देण्यात आली. यासाठी आमच्या वेबसाईटवर माहिती टाकण्यात आली आहे. वृत्तपत्रांमधून मात्र याबाबतची प्रसिद्ध करण्यात आली नाही. - एल.एल.ठवरे वन्यजीव संरक्षक, गोंदिया