शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अंधार गुडूप

By admin | Updated: July 23, 2014 23:41 IST

मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे.

वीज पुरवठा खंडित : सुमारे सवा लाख ग्राहकांना फटकागोंदिया : मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे. कोठे झाडे पडल्याने तर कोठे तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असून यामुळे अवघा जिल्हाच अंधार गुडूप झाल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला जबर फटका बसला आहे. तर जिल्ह्यातील सुमारे सवा लाख वीज ग्राहक अंधारात असल्याची माहिती आहे. मृगाच्या सुरूवातीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्हात काय अवघ्या राज्याला रडवून सोडले होते. पावसा अभावी बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला असून सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. सर्वांच्या मनातील ही आर्त हाक वरूणदेवताने ऐकली व मागील चार-पाच दिवसांपासून विदर्भात ठाण मांडला. राज्यासह अवघे विदर्भ पाणी-पाणी झाले असून यात विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सर्वाधीक पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर आज, बुधवारीही पाऊस सकाळपासूनच बरसतच होता. या संततधार पावसामुळे नदी-नाले ओथंबून वाहत असून दळण-वळणाचे मार्ग बंद पडले. शिवाय पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कोठे घरे व गोठे पडली, तर कोठे जनावरांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार घडत असतानाच वादळवारा व पावसामुळे जिल्ह्यात विद्युत विभागाचे चांगलेच नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडीत झाल्याने जिल्हा अंधारात आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला सर्वाधीक फटका बसल्याचे चित्र आहे. त्याचे असे की, संततधार पावसामुळे माडगीवरून निघणारी ६६ केव्ही लाईन बंद पडली असून त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुका प्रभावीत झाला आहे. या लाईनवर असलेली सुमारे ५३ गावे वीज पुरवठ्या अभावी असून त्यामुळे १४ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. तर ३३ केव्ही लाईनचे पाच फीडर बंद पडल्याने यावरील २८६ गावे व त्यातील सुमारे ४६ हजार ५०० ग्राहकांकडील वीज पुरवठा बंद पडला आहे. तसेच ११ केव्हीचे ३४ फीडर बंद पडले असून त्यावरील ४२१ गावे व त्यातील सुमारे ६३ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. पावसाने केलेल्या कहराने मात्र जनजिवन प्रभावीत झाले असून झालेल्या तुटफूटची दुरूस्ती व वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता विभाग जोमाने कामावर लागला आहे. (शहर प्रतिनिधी)