शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अंधार गुडूप

By admin | Updated: July 23, 2014 23:41 IST

मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे.

वीज पुरवठा खंडित : सुमारे सवा लाख ग्राहकांना फटकागोंदिया : मागील चार दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात चांगलाच कहर केला आहे. या पावसामुळे जन जिवनासह प्रामुख्याने वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाला आहे. कोठे झाडे पडल्याने तर कोठे तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला असून यामुळे अवघा जिल्हाच अंधार गुडूप झाल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला जबर फटका बसला आहे. तर जिल्ह्यातील सुमारे सवा लाख वीज ग्राहक अंधारात असल्याची माहिती आहे. मृगाच्या सुरूवातीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्हात काय अवघ्या राज्याला रडवून सोडले होते. पावसा अभावी बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला असून सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. सर्वांच्या मनातील ही आर्त हाक वरूणदेवताने ऐकली व मागील चार-पाच दिवसांपासून विदर्भात ठाण मांडला. राज्यासह अवघे विदर्भ पाणी-पाणी झाले असून यात विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यात सर्वाधीक पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर आज, बुधवारीही पाऊस सकाळपासूनच बरसतच होता. या संततधार पावसामुळे नदी-नाले ओथंबून वाहत असून दळण-वळणाचे मार्ग बंद पडले. शिवाय पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कोठे घरे व गोठे पडली, तर कोठे जनावरांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार घडत असतानाच वादळवारा व पावसामुळे जिल्ह्यात विद्युत विभागाचे चांगलेच नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडीत झाल्याने जिल्हा अंधारात आहे. यात प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्याला सर्वाधीक फटका बसल्याचे चित्र आहे. त्याचे असे की, संततधार पावसामुळे माडगीवरून निघणारी ६६ केव्ही लाईन बंद पडली असून त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुका प्रभावीत झाला आहे. या लाईनवर असलेली सुमारे ५३ गावे वीज पुरवठ्या अभावी असून त्यामुळे १४ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. तर ३३ केव्ही लाईनचे पाच फीडर बंद पडल्याने यावरील २८६ गावे व त्यातील सुमारे ४६ हजार ५०० ग्राहकांकडील वीज पुरवठा बंद पडला आहे. तसेच ११ केव्हीचे ३४ फीडर बंद पडले असून त्यावरील ४२१ गावे व त्यातील सुमारे ६३ हजार ५०० ग्राहक अंधारात आहेत. पावसाने केलेल्या कहराने मात्र जनजिवन प्रभावीत झाले असून झालेल्या तुटफूटची दुरूस्ती व वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता विभाग जोमाने कामावर लागला आहे. (शहर प्रतिनिधी)