शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अन् क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड

By admin | Updated: March 27, 2015 00:32 IST

विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला.

गोंदिया : विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला. चार वर्षापूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आॅस्ट्रेलियाने सहज मिळविलेला हा विजय गोंदियाकर क्रिकेटप्रेमींच्या चांगचा जिव्हारी लागला.अशा पद्धतीने निराशाजनक पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने गोंदियातील क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाला. यासोबतच क्रिकेटवर सट्टा आणि स्पर्धा लावणाऱ्यांचेही अंदाज पार चुकले.गुरुवार हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाचेही लक्ष या सामन्याकडे लागले होते. त्यासाठी सकाळपासूनच अनेक जण टिव्हीसमोर बसले होते. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तर टीव्हीवर क्रिेकेट सामना पाहता यावा म्हणून खास सुटीच घेऊन टाकली होती. तर महाविद्यालयीन तरुणांनी एका ठिकाणी जमून क्रिकेट पाहण्याची योजना आखली होती. भारत जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग अनेकांनी केले होते. पण सर्वांच्या अपेक्षा आणि आशांवर पाणी फेरल्या गेले. भारतीय संघच सामना जिंकणार असा विश्वास असणाऱ्या अनेकांनी पैजा (शर्यती) लावल्या. सट्टाबाजारही दिवसभर गरम होता. आॅस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारतीय संघाला पहिला झटका बसला. त्यातच तगडी फलंदाजी करीत उभारलेला धावांचा डोंगर ३०० पेक्षा पार केला तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. एवढे आव्हान आपला संघ पेलू शकणार का, अशी चिंता वाटत होती. अनेकांनी आशा सोडली नव्हती. मात्र सामना पुढे-पुढे सरकत असताना जिंकण्याची आशाही मावळत गेली. (जिल्हा प्रतिनिधी)