शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अन् क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड

By admin | Updated: March 27, 2015 00:32 IST

विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला.

गोंदिया : विश्वचषकात एकामागून एक सलग सात सामने जिंकून समस्त क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी उपांत्यफेरीचा महत्वपूर्ण सामना गमावला. चार वर्षापूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आॅस्ट्रेलियाने सहज मिळविलेला हा विजय गोंदियाकर क्रिकेटप्रेमींच्या चांगचा जिव्हारी लागला.अशा पद्धतीने निराशाजनक पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने गोंदियातील क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाला. यासोबतच क्रिकेटवर सट्टा आणि स्पर्धा लावणाऱ्यांचेही अंदाज पार चुकले.गुरुवार हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी शासकीय कर्मचाऱ्यांपासून तर व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाचेही लक्ष या सामन्याकडे लागले होते. त्यासाठी सकाळपासूनच अनेक जण टिव्हीसमोर बसले होते. काही शासकीय कर्मचाऱ्यांनी तर टीव्हीवर क्रिेकेट सामना पाहता यावा म्हणून खास सुटीच घेऊन टाकली होती. तर महाविद्यालयीन तरुणांनी एका ठिकाणी जमून क्रिकेट पाहण्याची योजना आखली होती. भारत जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष कसा साजरा करायचा याचेही प्लॅनिंग अनेकांनी केले होते. पण सर्वांच्या अपेक्षा आणि आशांवर पाणी फेरल्या गेले. भारतीय संघच सामना जिंकणार असा विश्वास असणाऱ्या अनेकांनी पैजा (शर्यती) लावल्या. सट्टाबाजारही दिवसभर गरम होता. आॅस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारतीय संघाला पहिला झटका बसला. त्यातच तगडी फलंदाजी करीत उभारलेला धावांचा डोंगर ३०० पेक्षा पार केला तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. एवढे आव्हान आपला संघ पेलू शकणार का, अशी चिंता वाटत होती. अनेकांनी आशा सोडली नव्हती. मात्र सामना पुढे-पुढे सरकत असताना जिंकण्याची आशाही मावळत गेली. (जिल्हा प्रतिनिधी)