शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अन् जिल्हाधिकारी पोहोचले बांध तलावावर

By admin | Updated: September 16, 2016 02:46 IST

शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या

तळ्याचे पाणी घरात : अतिक्रमणातून उभारलेली भिंत तोडण्याचे आदेश गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे तलावातून बाहेर निघून रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात येत आहे. अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला. त्याची दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले. तलावातील ओव्हरफलोचे पाणी निघण्यासाठी शेतशिवाराजवळून नाला वाहतो. मात्र त्या नाल्यावर अतिक्र मण करून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे बांधतलावाचे पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने पाणी सुर्याटोला परीसरातून रामनगर रस्त्यांवर वाहत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये हे पाणी शिरत आहे. रस्त्यावरही दोन ते तीन फुट पाणी वाहते. या रस्त्यावरून लोकांना येणे-जाणे कठीण झाले आहे. लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे असे लोक संपूर्ण दिवस घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरांत शिरलेले पाणी काढण्यात व्यस्त असल्याने त्यांचा रोजगार बुडत आहे. ही स्थिती बांधतलावर असलेल्या अतिक्रमणामुळेच उद्भवल्याची माहिती परीसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. बांधतलाव क्षेत्रातील सूर्याटोला रोडवर ज्यांनी अतिक्र मण केले आहे अशा अतिक्र मणधारकांना अतिक्र मण काढण्यासाठी नगर परिषदेकडून नोटीस देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी सूर्याटोला तसेच बांधतलाव येथे भेट दिली व बांधतलावावर असलेले अतिक्र मण व परीसराची पाहणी केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे बांधतलावावर असलेले अतिक्र मण तत्काळ हटविण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी निघण्यासाठी कुडव्याकडे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या भिंती तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापूर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र स्थिती गंभीर असल्याने दोन दिवसात हे अतिक्र मण हटविण्यात येईल व परीस्थितीवर नियंत्रण मिळविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या पाहणीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या भागातील नागरिकांना सदर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)