शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अन् जिल्हाधिकारी पोहोचले बांध तलावावर

By admin | Updated: September 16, 2016 02:46 IST

शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या

तळ्याचे पाणी घरात : अतिक्रमणातून उभारलेली भिंत तोडण्याचे आदेश गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे तलावातून बाहेर निघून रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात येत आहे. अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला. त्याची दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले. तलावातील ओव्हरफलोचे पाणी निघण्यासाठी शेतशिवाराजवळून नाला वाहतो. मात्र त्या नाल्यावर अतिक्र मण करून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे बांधतलावाचे पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने पाणी सुर्याटोला परीसरातून रामनगर रस्त्यांवर वाहत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये हे पाणी शिरत आहे. रस्त्यावरही दोन ते तीन फुट पाणी वाहते. या रस्त्यावरून लोकांना येणे-जाणे कठीण झाले आहे. लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे असे लोक संपूर्ण दिवस घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरांत शिरलेले पाणी काढण्यात व्यस्त असल्याने त्यांचा रोजगार बुडत आहे. ही स्थिती बांधतलावर असलेल्या अतिक्रमणामुळेच उद्भवल्याची माहिती परीसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. बांधतलाव क्षेत्रातील सूर्याटोला रोडवर ज्यांनी अतिक्र मण केले आहे अशा अतिक्र मणधारकांना अतिक्र मण काढण्यासाठी नगर परिषदेकडून नोटीस देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी सूर्याटोला तसेच बांधतलाव येथे भेट दिली व बांधतलावावर असलेले अतिक्र मण व परीसराची पाहणी केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे बांधतलावावर असलेले अतिक्र मण तत्काळ हटविण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत. बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी निघण्यासाठी कुडव्याकडे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या भिंती तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापूर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र स्थिती गंभीर असल्याने दोन दिवसात हे अतिक्र मण हटविण्यात येईल व परीस्थितीवर नियंत्रण मिळविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या पाहणीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या भागातील नागरिकांना सदर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)