शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:52 IST

सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष .....

ठळक मुद्देहरसन हॉटेलमध्ये आगीची घटना : वेळीच उपाययोजनेने हानी टळली

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१४) शहरातील हरसन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे पथक वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आल्याने ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली अशीच चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.२१ डिसेंबर २०१६ रोजी बिंदल हॉटेलमधील आगीची घटना जिल्ह्याच्या इतिहासात काळ््या शाईने लिहिल्या गेली. सात जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेनंतर इमारत मालक व अग्निशमन विभागाच्या डोक्यावर खापरही फोडण्यात आले. यावर अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स, लॉन, लॉज, दवाखाने व अन्य प्रतिष्ठांनाना फायर आॅडीट करविण्यासाठी नोटीस बजाविले होते. मात्र याला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. मागील रविवारी (दि.१४) शहरातील हरसंस हॉटेल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील मोठे हॉटेल आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांच्या फायर आॅडीटचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या हॉटेलचे अद्यापही फायर आॅडीट करण्यात आले नसल्याचे बोलल्या जाते. या हॉटेलमध्ये फायर इस्टिंगविशर सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. येथे आगीची घटना घडताच लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाय योजना करीत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली. अन्यथा पुन्हा बिंदलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने हरसन हॉटेललाही नोटीस दिली होती.६० जणांना बजावली नोटीसअग्निशमन विभागाचे निरीक्षक प्रकाश कापसे सेवानिवृत्त झाल्यानंतर छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन विभागाचा कारभार आला. त्यांनी आतापर्यंत शहरातील केटीएस रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणेतील काही दुरूस्त्यांसाठी तर अन्य खाजगी दवाखाने, लॉज, लॉन, रेस्टॉरेंट, खाजगी शाळा, हॉटेल्स, सुपर मार्केट अशा ६० व्यावसायीक प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस दिले आहे. मात्र यानंतरही आत्तापर्यंत केवळ १० प्रतिष्ठानांचे फायर आॅडीट झाले असून १५ जणांनी काम सुरू केले असल्याची माहिती पटले यांनी दिली. यातून बिंदलच्या घटनेनंतरही शहरातील व्यवसायी किती जागरूक झाले याची प्रचिती येते.परवाना विभागाचेच सहकार्य नाहीशहरात किती हॉटेल्स, लॉज व अन्य प्रतिष्ठान आहेत याची माहिती नगर परिषद परवाना विभागाकडे असते. या प्रतिष्ठांनाची यादी अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांना नोटीस देणे सोयीचे होणार आहे. मात्र परवाना विभागाकडून अशा प्रकारची यादी अग्निशमन विभागाला अद्यापही देण्यात आली नाही. परिणामी पटले यांना शहरात फिरून अशा या प्रतिष्ठानांना नोटीस द्यावे लागत असल्याने यात बराच वेळ जात आहे. एकीकडे अग्निशमन विभागात कर्मचाºयांची कमतरता असताना ही महत्वाचे कामे कशी करायची असा प्रश्न या विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे.