शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:52 IST

सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष .....

ठळक मुद्देहरसन हॉटेलमध्ये आगीची घटना : वेळीच उपाययोजनेने हानी टळली

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१४) शहरातील हरसन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे पथक वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आल्याने ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली अशीच चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.२१ डिसेंबर २०१६ रोजी बिंदल हॉटेलमधील आगीची घटना जिल्ह्याच्या इतिहासात काळ््या शाईने लिहिल्या गेली. सात जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेनंतर इमारत मालक व अग्निशमन विभागाच्या डोक्यावर खापरही फोडण्यात आले. यावर अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स, लॉन, लॉज, दवाखाने व अन्य प्रतिष्ठांनाना फायर आॅडीट करविण्यासाठी नोटीस बजाविले होते. मात्र याला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. मागील रविवारी (दि.१४) शहरातील हरसंस हॉटेल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील मोठे हॉटेल आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांच्या फायर आॅडीटचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या हॉटेलचे अद्यापही फायर आॅडीट करण्यात आले नसल्याचे बोलल्या जाते. या हॉटेलमध्ये फायर इस्टिंगविशर सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. येथे आगीची घटना घडताच लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाय योजना करीत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली. अन्यथा पुन्हा बिंदलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने हरसन हॉटेललाही नोटीस दिली होती.६० जणांना बजावली नोटीसअग्निशमन विभागाचे निरीक्षक प्रकाश कापसे सेवानिवृत्त झाल्यानंतर छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन विभागाचा कारभार आला. त्यांनी आतापर्यंत शहरातील केटीएस रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणेतील काही दुरूस्त्यांसाठी तर अन्य खाजगी दवाखाने, लॉज, लॉन, रेस्टॉरेंट, खाजगी शाळा, हॉटेल्स, सुपर मार्केट अशा ६० व्यावसायीक प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस दिले आहे. मात्र यानंतरही आत्तापर्यंत केवळ १० प्रतिष्ठानांचे फायर आॅडीट झाले असून १५ जणांनी काम सुरू केले असल्याची माहिती पटले यांनी दिली. यातून बिंदलच्या घटनेनंतरही शहरातील व्यवसायी किती जागरूक झाले याची प्रचिती येते.परवाना विभागाचेच सहकार्य नाहीशहरात किती हॉटेल्स, लॉज व अन्य प्रतिष्ठान आहेत याची माहिती नगर परिषद परवाना विभागाकडे असते. या प्रतिष्ठांनाची यादी अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांना नोटीस देणे सोयीचे होणार आहे. मात्र परवाना विभागाकडून अशा प्रकारची यादी अग्निशमन विभागाला अद्यापही देण्यात आली नाही. परिणामी पटले यांना शहरात फिरून अशा या प्रतिष्ठानांना नोटीस द्यावे लागत असल्याने यात बराच वेळ जात आहे. एकीकडे अग्निशमन विभागात कर्मचाºयांची कमतरता असताना ही महत्वाचे कामे कशी करायची असा प्रश्न या विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे.