शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:52 IST

सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष .....

ठळक मुद्देहरसन हॉटेलमध्ये आगीची घटना : वेळीच उपाययोजनेने हानी टळली

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या येथील बिंदल हॉटेल मधील आगीच्या प्रकरणाला जेमतेम वर्ष लोटले आहे. या घटनेचे भयानक चित्र व त्याचे परिणाम डोळ््यापुढे असताना शहरातील काही व्यावसायीक काही पैसे वाचविण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. रविवारी (दि.१४) शहरातील हरसन हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे पथक वेळीच दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आल्याने ‘बिंदल’ची पुनरावृत्ती टळली अशीच चर्चा शहरवासीयांमध्ये आहे.२१ डिसेंबर २०१६ रोजी बिंदल हॉटेलमधील आगीची घटना जिल्ह्याच्या इतिहासात काळ््या शाईने लिहिल्या गेली. सात जणांचा बळी घेणाऱ्या या घटनेनंतर इमारत मालक व अग्निशमन विभागाच्या डोक्यावर खापरही फोडण्यात आले. यावर अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स, लॉन, लॉज, दवाखाने व अन्य प्रतिष्ठांनाना फायर आॅडीट करविण्यासाठी नोटीस बजाविले होते. मात्र याला फार अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. मागील रविवारी (दि.१४) शहरातील हरसंस हॉटेल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर शहरातील मोठे हॉटेल आणि व्यावसायीक प्रतिष्ठानांच्या फायर आॅडीटचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला. या हॉटेलचे अद्यापही फायर आॅडीट करण्यात आले नसल्याचे बोलल्या जाते. या हॉटेलमध्ये फायर इस्टिंगविशर सिलेंडर ठेवण्यात आले आहेत. येथे आगीची घटना घडताच लगेच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाय योजना करीत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली. अन्यथा पुन्हा बिंदलची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाने हरसन हॉटेललाही नोटीस दिली होती.६० जणांना बजावली नोटीसअग्निशमन विभागाचे निरीक्षक प्रकाश कापसे सेवानिवृत्त झाल्यानंतर छबीलाल पटले यांच्याकडे अग्निशमन विभागाचा कारभार आला. त्यांनी आतापर्यंत शहरातील केटीएस रुग्णालयाला अग्निशमन यंत्रणेतील काही दुरूस्त्यांसाठी तर अन्य खाजगी दवाखाने, लॉज, लॉन, रेस्टॉरेंट, खाजगी शाळा, हॉटेल्स, सुपर मार्केट अशा ६० व्यावसायीक प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस दिले आहे. मात्र यानंतरही आत्तापर्यंत केवळ १० प्रतिष्ठानांचे फायर आॅडीट झाले असून १५ जणांनी काम सुरू केले असल्याची माहिती पटले यांनी दिली. यातून बिंदलच्या घटनेनंतरही शहरातील व्यवसायी किती जागरूक झाले याची प्रचिती येते.परवाना विभागाचेच सहकार्य नाहीशहरात किती हॉटेल्स, लॉज व अन्य प्रतिष्ठान आहेत याची माहिती नगर परिषद परवाना विभागाकडे असते. या प्रतिष्ठांनाची यादी अग्निशमन विभागाला मिळाल्यास त्यांना नोटीस देणे सोयीचे होणार आहे. मात्र परवाना विभागाकडून अशा प्रकारची यादी अग्निशमन विभागाला अद्यापही देण्यात आली नाही. परिणामी पटले यांना शहरात फिरून अशा या प्रतिष्ठानांना नोटीस द्यावे लागत असल्याने यात बराच वेळ जात आहे. एकीकडे अग्निशमन विभागात कर्मचाºयांची कमतरता असताना ही महत्वाचे कामे कशी करायची असा प्रश्न या विभागाच्या अधिकाºयांसमोर निर्माण झाला आहे.