शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आमगाववासीय चार दिवसांपासून तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:37 IST

आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा ठप्प : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

आॅनलाईन लोकमतआमगाव : आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरवासीय तहानलेले असताना प्रशासनाने मात्र यावर कुठलीही उपाययोजना केलेली नाही.आमगाव येथे सध्या नगरपरिषद निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्य न्यायालयाने आमगाव नगर परिषद निवडणुक रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राजकीय पुढारी आणि प्रशासन सुध्दा याच कामात व्यस्त आहे. परिणामी शहरवासीयांच्या समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आमगाव येथे चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. सामन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासाठी नगर परिषद संघर्ष समिती शिवाय कुणीही राजकीय पुढारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे आले नाहीत. त्यामुळे शहरवासीयांची समस्या अद्यापही कायम आहे. नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेते व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आमगाव शहराला बनगाव पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र त्या मागील कारणाचा शोध घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे नागरिकांनी यासर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षशहरातील शौचालयाचा प्रश्न, घरकुलांची समस्या, जमीन हक्काचा प्रश्न, सांडपाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे नियोजन व पुर्ततेचा प्रश्न असे अनेक प्रश्नांवर राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शहरवासीयांच्या समस्या अद्यापही कायम आहे.पाणी पुरवठा सयंत्रामधील व्हॉल्व खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ते बदलण्यासाठी काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत पाणी पुरवठा पूर्ववत होईल.-साहेबराव राठोड,प्रशासक तथा तहसीलदार, आमगाव