शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

आमगाववासीय चार दिवसांपासून तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:37 IST

आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा ठप्प : प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

आॅनलाईन लोकमतआमगाव : आमगाव शहराला मागील चार दिवसांपासून पिण्याचा पाण्याचा पुरवठा ठप्प आहे. परिणामी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरवासीय तहानलेले असताना प्रशासनाने मात्र यावर कुठलीही उपाययोजना केलेली नाही.आमगाव येथे सध्या नगरपरिषद निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्य न्यायालयाने आमगाव नगर परिषद निवडणुक रद्दच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे राजकीय पुढारी आणि प्रशासन सुध्दा याच कामात व्यस्त आहे. परिणामी शहरवासीयांच्या समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आमगाव येथे चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांत तीव्र असंतोष आहे. सामन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यासाठी नगर परिषद संघर्ष समिती शिवाय कुणीही राजकीय पुढारी अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे आले नाहीत. त्यामुळे शहरवासीयांची समस्या अद्यापही कायम आहे. नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेते व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आमगाव शहराला बनगाव पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसांपासून अचानक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र त्या मागील कारणाचा शोध घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे नागरिकांनी यासर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षशहरातील शौचालयाचा प्रश्न, घरकुलांची समस्या, जमीन हक्काचा प्रश्न, सांडपाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे नियोजन व पुर्ततेचा प्रश्न असे अनेक प्रश्नांवर राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शहरवासीयांच्या समस्या अद्यापही कायम आहे.पाणी पुरवठा सयंत्रामधील व्हॉल्व खराब झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ते बदलण्यासाठी काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत पाणी पुरवठा पूर्ववत होईल.-साहेबराव राठोड,प्रशासक तथा तहसीलदार, आमगाव