शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीसोबतच आता वरणही ताटातून आऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी ...

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी फोडणीचे वरण खाऊन चालवून घेऊ, असे गणित सर्वसामान्यांनाकडून जुळविले जात होते. मात्र डाळींचे दरसुद्धा १०० पर्यंत असल्याने ताटातून वरणही आऊट होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक भाजीपाला महागला असून डाळींचे दर काही प्रमाणात उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना परवडणारे दर आजही नसल्याने काय खावे असा प्रश्न पडतच आहे.

------------------------

१) डाळींचे दर (प्रती किलो)

हरभरा -७०

तूर - ९५

मूग -१००

उडीद - १२०

मसूर - ९०

२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)

बटाटा - २०

कांदा - ३०

टोमॅटो - ४०

काकडी - २०

कोथिंबीर - १६०

पालक - ६०

मेथी - ८०

दोडके - ४०

लिंबू - ४०

गवार - ६०

-----------------------

म्हणून डाळ महागली...

आजघडीला सर्वच वस्तूंचे दर चढत असून त्यामागे पेट्रोल-डिझेल दरवाड कारणीभूत आहे. मागील वर्षभपारासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहे. परिणामी प्रत्येकच वस्तूंच्या ट्रान्सपोर्टिंगचे दरसुद्धा तसेच वाढत चालले आहे. परिणामी महागाई वाढत चालली आहे. सध्या डाळींचे दर साधारण ५ रुपये दराने घसरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र आहे ते दर ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून सर्वांच्याच खिशाला परवडणारे नाहीत.

------------------------

म्हणून भाजीपाला कडाडला

पावसाळ्यात साधारणत: शेतकरी भाजीपाला पीक घेत नाहीत. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी असते. शिवाय नागपूरवरून भाजीपाला येत असून पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे दर चढले आहे. त्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे ट्रासपोर्ट खर्च वाढला असून या सर्वच बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत.

- राजू देशमुख

भाजी विक्रेता

--------------------------

भाज्यांचे दर कडाडल्याने भाज्या सोडून फोडणीच्या वरणावर चालवून घ्यायचो. मात्र आता डाळींचे जर १०० च्या घरात असून त्या सुद्धा आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे, असा प्रश्न पडत असून महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

- नेहा निनावे (गृहिणी)

----------------------------------

भाज्या एवढ्या महागल्या आहेत की त्यांचे दर ऐकूनच घाम फुटतो. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्या गायबच झाल्या आहेत. त्यात महागाईमुळे डाळीही वधारल्या असून वरण-भात खाणेही खिशाला परवडणारे नाही. सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणावी.

- नितू ढोमणे (गृहिणी)