शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

भाजीसोबतच आता वरणही ताटातून आऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी ...

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी फोडणीचे वरण खाऊन चालवून घेऊ, असे गणित सर्वसामान्यांनाकडून जुळविले जात होते. मात्र डाळींचे दरसुद्धा १०० पर्यंत असल्याने ताटातून वरणही आऊट होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक भाजीपाला महागला असून डाळींचे दर काही प्रमाणात उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना परवडणारे दर आजही नसल्याने काय खावे असा प्रश्न पडतच आहे.

------------------------

१) डाळींचे दर (प्रती किलो)

हरभरा -७०

तूर - ९५

मूग -१००

उडीद - १२०

मसूर - ९०

२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)

बटाटा - २०

कांदा - ३०

टोमॅटो - ४०

काकडी - २०

कोथिंबीर - १६०

पालक - ६०

मेथी - ८०

दोडके - ४०

लिंबू - ४०

गवार - ६०

-----------------------

म्हणून डाळ महागली...

आजघडीला सर्वच वस्तूंचे दर चढत असून त्यामागे पेट्रोल-डिझेल दरवाड कारणीभूत आहे. मागील वर्षभपारासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहे. परिणामी प्रत्येकच वस्तूंच्या ट्रान्सपोर्टिंगचे दरसुद्धा तसेच वाढत चालले आहे. परिणामी महागाई वाढत चालली आहे. सध्या डाळींचे दर साधारण ५ रुपये दराने घसरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र आहे ते दर ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून सर्वांच्याच खिशाला परवडणारे नाहीत.

------------------------

म्हणून भाजीपाला कडाडला

पावसाळ्यात साधारणत: शेतकरी भाजीपाला पीक घेत नाहीत. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी असते. शिवाय नागपूरवरून भाजीपाला येत असून पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे दर चढले आहे. त्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे ट्रासपोर्ट खर्च वाढला असून या सर्वच बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत.

- राजू देशमुख

भाजी विक्रेता

--------------------------

भाज्यांचे दर कडाडल्याने भाज्या सोडून फोडणीच्या वरणावर चालवून घ्यायचो. मात्र आता डाळींचे जर १०० च्या घरात असून त्या सुद्धा आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे, असा प्रश्न पडत असून महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

- नेहा निनावे (गृहिणी)

----------------------------------

भाज्या एवढ्या महागल्या आहेत की त्यांचे दर ऐकूनच घाम फुटतो. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्या गायबच झाल्या आहेत. त्यात महागाईमुळे डाळीही वधारल्या असून वरण-भात खाणेही खिशाला परवडणारे नाही. सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणावी.

- नितू ढोमणे (गृहिणी)