शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीसोबतच आता वरणही ताटातून आऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी ...

गोंदिया : भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने काय खावे, असा प्रश्न पडत असून ताटातून भाजी गायब झाली असून त्याच्या जागी फोडणीचे वरण खाऊन चालवून घेऊ, असे गणित सर्वसामान्यांनाकडून जुळविले जात होते. मात्र डाळींचे दरसुद्धा १०० पर्यंत असल्याने ताटातून वरणही आऊट होत असल्याचे दिसत आहे. वास्तविक भाजीपाला महागला असून डाळींचे दर काही प्रमाणात उतरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना परवडणारे दर आजही नसल्याने काय खावे असा प्रश्न पडतच आहे.

------------------------

१) डाळींचे दर (प्रती किलो)

हरभरा -७०

तूर - ९५

मूग -१००

उडीद - १२०

मसूर - ९०

२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)

बटाटा - २०

कांदा - ३०

टोमॅटो - ४०

काकडी - २०

कोथिंबीर - १६०

पालक - ६०

मेथी - ८०

दोडके - ४०

लिंबू - ४०

गवार - ६०

-----------------------

म्हणून डाळ महागली...

आजघडीला सर्वच वस्तूंचे दर चढत असून त्यामागे पेट्रोल-डिझेल दरवाड कारणीभूत आहे. मागील वर्षभपारासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहे. परिणामी प्रत्येकच वस्तूंच्या ट्रान्सपोर्टिंगचे दरसुद्धा तसेच वाढत चालले आहे. परिणामी महागाई वाढत चालली आहे. सध्या डाळींचे दर साधारण ५ रुपये दराने घसरल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र आहे ते दर ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून सर्वांच्याच खिशाला परवडणारे नाहीत.

------------------------

म्हणून भाजीपाला कडाडला

पावसाळ्यात साधारणत: शेतकरी भाजीपाला पीक घेत नाहीत. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी असते. शिवाय नागपूरवरून भाजीपाला येत असून पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे दर चढले आहे. त्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ यामुळे ट्रासपोर्ट खर्च वाढला असून या सर्वच बाबी महागाईसाठी कारणीभूत आहेत.

- राजू देशमुख

भाजी विक्रेता

--------------------------

भाज्यांचे दर कडाडल्याने भाज्या सोडून फोडणीच्या वरणावर चालवून घ्यायचो. मात्र आता डाळींचे जर १०० च्या घरात असून त्या सुद्धा आवाक्याबाहेर झाल्या आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे, असा प्रश्न पडत असून महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

- नेहा निनावे (गृहिणी)

----------------------------------

भाज्या एवढ्या महागल्या आहेत की त्यांचे दर ऐकूनच घाम फुटतो. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्या गायबच झाल्या आहेत. त्यात महागाईमुळे डाळीही वधारल्या असून वरण-भात खाणेही खिशाला परवडणारे नाही. सर्वसामान्यांनी जगावे कसे, असा प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणावी.

- नितू ढोमणे (गृहिणी)