शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

निकालानंतर सर्वच पक्षांचे दावे प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:56 IST

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.

ठळक मुद्देमतदार संभ्रमात : ग्रामपंचायत निवडणूक, गाठीभेटीचे सत्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर झाले. यानंतर भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस या सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. यावरुन काही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. सर्वच पक्षांनी दावे प्रतिदावे केल्याने मतदार मात्र अद्यापही संभ्रमात असल्याचे चित्र आहे.निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र यापैकी ३ ग्रामपंचायतीची निवडणूक आक्षेप घेतल्याने रद्द झाली. तर तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे उर्वरित ३४१ ग्रामपंचायतीसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक घेण्यात आली. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १०५७ तर २९७४ सदस्यपदासाठी ८ हजार सदस्य निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी निकालानंतर आमगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा तालुक्यात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा त्या पक्षाच्या नेत्यांनी केला. तर देवरी तालुक्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. तर हीच स्थिती गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कायम होती. येथे सुध्दा सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला.यावरुन काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाले. काही पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक निकालानंतर लगेच प्रसिध्दी पत्रक काढून आपल्या पक्षाचे समर्थन असलेले सर्वाधिक सरपंच कसे निवडून आले, याची यादीच पाठविली. तर काहींनी आकड्यांचे गणित सुध्दा जुळवून पाठविली. सर्वच पक्षांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयांना सर्वाधिक जागा निवडून आल्याचे प्रसिध्दपत्रक पाठवून आपल्या पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला. त्यामुळे नेमके कुठल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले हे कळायला मतदारांना मार्ग नाही.सरपंच, सदस्यांची मनधरणीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर आपले पक्षाचे वर्चस्व असावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. यासाठी त्या त्या गावातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.अपक्ष सदस्यांकडे लक्षग्रामपंचायतीत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले अपक्ष सरपंच आणि सदस्य हे आता कुठली भूमिका घेतात. अपक्ष म्हणून राहतात की कुठल्या पक्षात प्रवेश करतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे.थेट निवडीने उत्सुकता संपलीयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. शिवाय निवडून आलेल्या सरपंचावर अडीच वर्षे अविश्वास आणता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होणार, सरपंचपदी कोण आरुढ होणार याबाबत पूर्वी असलेली उत्सुकता थेट सरपंच निवडीने आता संपुष्टात आली.सरपंचांना छाप सोडण्याची संधीसरपंचपदी निवडून आलेल्यांना ग्रामपंचायतचा कारभार साभाळतांना आता कुठलीही अडचण नाही. त्यामुळे सरपंचांने गाव विकासाची रुपरेषा आखून कामे केल्यास मतदारांवर छाप सोडण्याची संधी मिळणार आहे. शिवाय गावाचा सर्वांगिन विकास करुन गावकºयांसमोर आदर्श ठेवता येणार आहे.