शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुव्यवस्थेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: September 3, 2016 00:02 IST

सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे

पोलीस निरीक्षक खांदारे : शांतता समितीच्या बैठकीत आवाहनसालेकसा : सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे दोन धर्माचे दोन मोठे उत्सव सोबतच येत आहेत. या दरम्यान सलोख्याचे वातावरण बनवून ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभाग शांती, सुव्यवस्था असावी म्हणून सतत प्रयत्नशील आहे, ते राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. तरी समाजातील सर्व जवाबदार व समजदार घटकांनी यासाठी सतत सहकार्य करावे, असे आवाहन सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या सभागृहात तालुकास्तरीय शांतता बैठक घेण्यात आली. या वेळी ते उपस्थितांच्या माध्यमातून तालुकावासीयांना आवाहन करीत बोलले.येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सालेकसा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मोहन खांदारे होते. या वेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, समाजसेवक, पोलीस पाटील, वकील, पत्रकार, स्वयंसेवी संगठनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.ठाणेदार खांदारे पुढे म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात पोळा, मारबत असून ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मधात १२ सप्टेंबरला बकरी ईद आणि १५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार असून या दरम्यान गर्दीचा उत्साह तसेच नाच गाणे चालत असतात. अशात अनेकवेळा छोटेमोठे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक शांतता भंग करण्यासाठी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. शेवटी नुकसान समाजातील निर्दोष जनतेचा होतो. तथा कथीत समाजहीत साधणाऱ्यांचा पाठबळ मिळाल्यास सामाजिक व जातीय सलोखा भंग होतो. अशा वेळी जबाबदार घटकांनी प्रशासनाला मदत करीत समाजात शांतता राखण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन केले.चर्चेदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्सवादरम्यान काय करावे व काय टाळावे याबद्दल सविस्तर चर्चा केली. समाजात शांतता राखण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या विचारांचे आदान प्रदान उपस्थित मान्यवरांनी व सदस्यांनी केली. बैठकीला सेवानिवृत्त ए.एस.आय. मनोहर बारसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव फुंडे, गोविंदा रहांगडाले, अ‍ॅड. पारसनाथ थरे, पत्रकार विजय मानकर, गणेश भदाडे, रमेश चुटे, जमीन अली सैयद, शोभाराम शहारे, निर्दोष साखरे, राजेंद्र भस्मोटे, आदित्य शर्मा, तुकाराम बोहरे, बबलू कटरे, विनोद जैन, राजू काळे, कुलतार सिंग भाटीया, डॉ. संजय देशमुख, मनोज शरणागत, मोहन वळतकर, योगेश फुंडे व इतर मान्यवर सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)