शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सुव्यवस्थेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: September 3, 2016 00:02 IST

सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे

पोलीस निरीक्षक खांदारे : शांतता समितीच्या बैठकीत आवाहनसालेकसा : सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे दोन धर्माचे दोन मोठे उत्सव सोबतच येत आहेत. या दरम्यान सलोख्याचे वातावरण बनवून ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभाग शांती, सुव्यवस्था असावी म्हणून सतत प्रयत्नशील आहे, ते राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. तरी समाजातील सर्व जवाबदार व समजदार घटकांनी यासाठी सतत सहकार्य करावे, असे आवाहन सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या सभागृहात तालुकास्तरीय शांतता बैठक घेण्यात आली. या वेळी ते उपस्थितांच्या माध्यमातून तालुकावासीयांना आवाहन करीत बोलले.येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सालेकसा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मोहन खांदारे होते. या वेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, समाजसेवक, पोलीस पाटील, वकील, पत्रकार, स्वयंसेवी संगठनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.ठाणेदार खांदारे पुढे म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात पोळा, मारबत असून ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मधात १२ सप्टेंबरला बकरी ईद आणि १५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार असून या दरम्यान गर्दीचा उत्साह तसेच नाच गाणे चालत असतात. अशात अनेकवेळा छोटेमोठे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक शांतता भंग करण्यासाठी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. शेवटी नुकसान समाजातील निर्दोष जनतेचा होतो. तथा कथीत समाजहीत साधणाऱ्यांचा पाठबळ मिळाल्यास सामाजिक व जातीय सलोखा भंग होतो. अशा वेळी जबाबदार घटकांनी प्रशासनाला मदत करीत समाजात शांतता राखण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन केले.चर्चेदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्सवादरम्यान काय करावे व काय टाळावे याबद्दल सविस्तर चर्चा केली. समाजात शांतता राखण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या विचारांचे आदान प्रदान उपस्थित मान्यवरांनी व सदस्यांनी केली. बैठकीला सेवानिवृत्त ए.एस.आय. मनोहर बारसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव फुंडे, गोविंदा रहांगडाले, अ‍ॅड. पारसनाथ थरे, पत्रकार विजय मानकर, गणेश भदाडे, रमेश चुटे, जमीन अली सैयद, शोभाराम शहारे, निर्दोष साखरे, राजेंद्र भस्मोटे, आदित्य शर्मा, तुकाराम बोहरे, बबलू कटरे, विनोद जैन, राजू काळे, कुलतार सिंग भाटीया, डॉ. संजय देशमुख, मनोज शरणागत, मोहन वळतकर, योगेश फुंडे व इतर मान्यवर सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)