शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

सर्वच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:24 IST

निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. उलट देशात नेमके या विरोधात चित्र आहे. त्यामुळे विद्यमान सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व आदिवासी मेळावा सोमवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, रमेश ताराम, मनोहर चंद्रिकापुरे, निता मेश्राम, गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, अविनाश काशिवार, नरेश भेंडारकर, चंद्रकांत मरस्कोल्हे, इंजि. डी.यू.रहांगडाले, सुधाकर पंधरे, इंदू परशुरामकर, मंजू डोंगरवार, दिनेश कोरे, सचिन येसनसुरे, रुपविलास कुरसुंगे, एफ.आर.टी.शहा, सुनिता चिंधालोरे, बंटी भाटीया, सी.के. बिसेन, सेवकराम रहांगडाले, अनिता बाबोडे, डॉ.वाढई, उषा रहांगडाले, सुधा रहांगडाले, हटवार, क्रिष्णा सुरसाम, भरतलाल ठलाल, चंदन ठलाल व आदिवासीबांधव उपस्थित होते. खा.पटेल व कुकडे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पटेल म्हणाले, सरकारने अलीकडे गावागावातील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील चुलबंद, गोसेखुर्द, भिमलकसा, बावणथडी या धरणाची निर्मिती आमच्या सरकारच्या कार्याकाळात करण्यात आली.विद्यमान सरकारने मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात एकही मोठा सिंचन प्रकल्प मार्गी लावला नाही. उलट भेलसारखा मोठा उद्योग बंद पाडण्याचे काम केले. केंद्र व राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीेभाव देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिन विकास हेच आपले ध्येय आहे.आदिवासी समाजाच्या विकासात क्रांतीसूर्य विर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुतळा उभारण्यासाठी डुंडा येथील आदिवासीबांधवानी मनोहर चंद्रिकापूरे व निता मेश्राम आभार मानले. डुंडा येथील विठ्ठल रुखमाई मंदिराला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध बांबोडे यांनी केले तर आभार अविनाश काशिवार यांनी मानले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल