शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:24 IST

निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही. उलट देशात नेमके या विरोधात चित्र आहे. त्यामुळे विद्यमान सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील डुंडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व आदिवासी मेळावा सोमवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, रमेश ताराम, मनोहर चंद्रिकापुरे, निता मेश्राम, गंगाधर परशुरामकर, रमेश चुºहे, अविनाश काशिवार, नरेश भेंडारकर, चंद्रकांत मरस्कोल्हे, इंजि. डी.यू.रहांगडाले, सुधाकर पंधरे, इंदू परशुरामकर, मंजू डोंगरवार, दिनेश कोरे, सचिन येसनसुरे, रुपविलास कुरसुंगे, एफ.आर.टी.शहा, सुनिता चिंधालोरे, बंटी भाटीया, सी.के. बिसेन, सेवकराम रहांगडाले, अनिता बाबोडे, डॉ.वाढई, उषा रहांगडाले, सुधा रहांगडाले, हटवार, क्रिष्णा सुरसाम, भरतलाल ठलाल, चंदन ठलाल व आदिवासीबांधव उपस्थित होते. खा.पटेल व कुकडे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पटेल म्हणाले, सरकारने अलीकडे गावागावातील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील चुलबंद, गोसेखुर्द, भिमलकसा, बावणथडी या धरणाची निर्मिती आमच्या सरकारच्या कार्याकाळात करण्यात आली.विद्यमान सरकारने मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात एकही मोठा सिंचन प्रकल्प मार्गी लावला नाही. उलट भेलसारखा मोठा उद्योग बंद पाडण्याचे काम केले. केंद्र व राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यास धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीेभाव देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गोंदिया-भंडारा जिल्हाचा सर्वांगिन विकास हेच आपले ध्येय आहे.आदिवासी समाजाच्या विकासात क्रांतीसूर्य विर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुतळा उभारण्यासाठी डुंडा येथील आदिवासीबांधवानी मनोहर चंद्रिकापूरे व निता मेश्राम आभार मानले. डुंडा येथील विठ्ठल रुखमाई मंदिराला तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन पटेल यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध बांबोडे यांनी केले तर आभार अविनाश काशिवार यांनी मानले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल