शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवारा बनला दारुड्यांचा अड्डा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

केशोरी : येथे परिवहन मंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी ...

केशोरी : येथे परिवहन मंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. मात्र रात्रीला या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग दारुड्यांना होत असून प्रवासी निवारा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. निवाऱ्यात पडून असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या याची साक्ष देत आहे. यावरून गावात दारू शौकिनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर प्रवासी निवाऱ्यात दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाच्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने प्रवाशांचा उन्ह व पावसापासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात प्रवासी निवारे तयार केले. त्यानुसार, येथे आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. या प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी हॉटेल व दुकाने लावली आहेत. याचाच फायदा घेत रात्रीला प्रवाशांपेक्षा गावातील दारुड्यांची मैफील प्रवासी निवाऱ्यात लागत आहे. प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीजवळ जिकडे-तिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या असून दारुड्यांच्या पार्टीची साक्ष देत आहे.

येथील रिकाम्या बाॅटल पाहून हा दारू पिण्याचा खेळ दररोज रात्री चालत असावा असे दिसून येत असून तशी गावात चर्चा सुरू आहे. येथे बसून दारू पिणाऱ्यांवर वचप बसविणे काळाची गरज आहे. अन्यथा तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.

------------------------

दारुड्यांवर कारवाईची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डिसेंबर १९९९ मधील गोळीबार कांडाचा उगम याच ठिकाणावरून झाला होता हे विशेष. त्यानंतर हे चित्र बघून गोळीबार कांडाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रवासी निवाऱ्यात बसून दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दखल घेऊन दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.