शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धोक्याची घंटा ! मुदत संपूनही दुसरा डोस टोलवणाऱ्यांचा ग्राफ चढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

कपिल केकत गोंदिया : तिसऱ्या लाटेच्या भीतीने एकीकडे जेथे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासनाची धडपड सुरू ...

कपिल केकत

गोंदिया : तिसऱ्या लाटेच्या भीतीने एकीकडे जेथे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासनाची धडपड सुरू आहे, तेथेच दुसरीकडे विनाकारण लसीकरण टोलवून शासनाच्या उद्दिष्टाला छेद देण्याचे काम काही बेजबाबदार नागरिकांकडून केले जात आहे. यामुळेच मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांचा जिल्ह्यातील ग्राफ चढताच दिसून येत आहे. ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा त्याच्याशी लढण्यासाठी हाती काहीच नसल्याने कोरोनाने कहर केला होता. मात्र, जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली व त्यानंतर मार्चपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. मात्र, लस हाती असतानाही दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जास्त कहर केला व कित्येकांच्या जीवलगांना घेऊन गेला. जेवढ्या जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे होते, तेवढे लसीकरण न झाल्याने कोरोनाला दुसऱ्या लाटेतही आपला डाव साधता आल्याचे दिसले. यामुळेच आता कोरोनाला थोपविण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण हा एकच सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

त्यानुसार, शासनाने लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू केली असून, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण हेच उद्दिष्ट ठेवून लसीकरणासाठी धडपड सुरू आहे. यात देशात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जिल्ह्यात ९१ टक्के लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे. ही जेवढी वाखाणण्याजोगी बाब, तेवढीच खेदाची बाब म्हणजे, कित्येक नागरिक विनाकारण लसीकरण टोलवत आहेत. यामध्ये मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.

-------------------------------------

४१,८५२ नागरिकांची पडली भर

लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातील अभ्यास केला असता त्यात मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे दिसून आले. याला सविस्तर जाणून घेतले असता ३ सप्टेंबरपर्यंत १,७९,३३५ नागरिकांनी, तर १६ सप्टेंबरपर्यंत २,२१,१८७ नागरिकांनी दुसरा डोस टोलवल्याचे दिसले. म्हणजेच हा ग्राफ वाढतच चालला असून, १३ दिवसांच्या या अंतरात तब्बल ४१,८५२ नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस न घेतल्याचे दिसत आहे.

------------------------------

डोस पूर्ण न करणार व्यक्ती धोक्याची

दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही मनात धडकी भरवणारा असून, तो काळ कधीच परतून येऊ नये असे सर्वच म्हणतात. मात्र, त्यानंतरही लाखोंच्या संख्येत नागरिक लसीकरण टाळत आहेत ही बाब मात्र समजण्यापलीकडे आहे. यावरून कोरोनामुळे ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली, त्यांनाच याचे गांभीर्य आले असल्याचे म्हणता येईल. मात्र, लस न घेणारी व्यक्ती आजही समाजासाठी तेवढीच धोकादायक असल्याने आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तरी प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.