शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

धोक्याची घंटा ! मुदत संपूनही दुसरा डोस टोलवणाऱ्यांचा ग्राफ चढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

कपिल केकत गोंदिया : तिसऱ्या लाटेच्या भीतीने एकीकडे जेथे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासनाची धडपड सुरू ...

कपिल केकत

गोंदिया : तिसऱ्या लाटेच्या भीतीने एकीकडे जेथे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी शासनाची धडपड सुरू आहे, तेथेच दुसरीकडे विनाकारण लसीकरण टोलवून शासनाच्या उद्दिष्टाला छेद देण्याचे काम काही बेजबाबदार नागरिकांकडून केले जात आहे. यामुळेच मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांचा जिल्ह्यातील ग्राफ चढताच दिसून येत आहे. ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा त्याच्याशी लढण्यासाठी हाती काहीच नसल्याने कोरोनाने कहर केला होता. मात्र, जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली व त्यानंतर मार्चपासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. मात्र, लस हाती असतानाही दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जास्त कहर केला व कित्येकांच्या जीवलगांना घेऊन गेला. जेवढ्या जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे होते, तेवढे लसीकरण न झाल्याने कोरोनाला दुसऱ्या लाटेतही आपला डाव साधता आल्याचे दिसले. यामुळेच आता कोरोनाला थोपविण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण हा एकच सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

त्यानुसार, शासनाने लसीकरणासाठी व्यापक मोहीम सुरू केली असून, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण हेच उद्दिष्ट ठेवून लसीकरणासाठी धडपड सुरू आहे. यात देशात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जिल्ह्यात ९१ टक्के लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे. ही जेवढी वाखाणण्याजोगी बाब, तेवढीच खेदाची बाब म्हणजे, कित्येक नागरिक विनाकारण लसीकरण टोलवत आहेत. यामध्ये मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी बघितल्यास १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस टोलवला होता. आता मात्र १६ सप्टेंबरपर्यंत तीच संख्या वाढून २,२१,१८७ एवढी झाली आहे.

-------------------------------------

४१,८५२ नागरिकांची पडली भर

लसीकरणाला घेऊन जिल्ह्यातील अभ्यास केला असता त्यात मुदत संपूनही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे दिसून आले. याला सविस्तर जाणून घेतले असता ३ सप्टेंबरपर्यंत १,७९,३३५ नागरिकांनी, तर १६ सप्टेंबरपर्यंत २,२१,१८७ नागरिकांनी दुसरा डोस टोलवल्याचे दिसले. म्हणजेच हा ग्राफ वाढतच चालला असून, १३ दिवसांच्या या अंतरात तब्बल ४१,८५२ नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस न घेतल्याचे दिसत आहे.

------------------------------

डोस पूर्ण न करणार व्यक्ती धोक्याची

दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही मनात धडकी भरवणारा असून, तो काळ कधीच परतून येऊ नये असे सर्वच म्हणतात. मात्र, त्यानंतरही लाखोंच्या संख्येत नागरिक लसीकरण टाळत आहेत ही बाब मात्र समजण्यापलीकडे आहे. यावरून कोरोनामुळे ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली, त्यांनाच याचे गांभीर्य आले असल्याचे म्हणता येईल. मात्र, लस न घेणारी व्यक्ती आजही समाजासाठी तेवढीच धोकादायक असल्याने आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तरी प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.