शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आकाश व दीपिका ठरले जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 00:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर

गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर विभागात दुसरा क्रमांक पटकावला. गोंदियातील विवेक मंदिर स्कूलच्या आकाश नितीन कोतवाल आणि दीपिका दामोधर वाघमारे यांनी ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.गोंदियातील रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या (बंगाली स्कूल) अभिषेक रहांगडाले याने ९६.६० टक्के गुण घेत द्वितीय तर आमगावच्या आदर्श विद्यालयाची पूनम तुरकर ही ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरी आली आहे.जिल्ह्यात २२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २२ हजार ८८२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यात १९ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.०३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.७२ टक्के आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २४३३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. ७८२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८७९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १७५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २९५ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेले बसले होते. त्यात ११ हजार ३२३ विद्यार्थी आणि ११ हजार ५५९ विद्यार्थिनी होत्या. एकूण २२ हजार ८८२ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. त्यातून ९ हजार ५९३ विद्यार्थी आणि १० हजार २९१ विद्यार्थिनींना मिळून एकूम १९ हजार ८८४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.७२ तर उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी ८५.३९ आहे. यावर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी जास्त संख्येने उत्तीर्ण होऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यावर्षी बारावीच्या निकालात गोंदिया जिल्हा नागपूर विभागात पहिला होता. आता दहावीत विभागात दुसरा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)