शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कृषी विभाग म्हणते जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी

By admin | Updated: August 30, 2014 01:47 IST

यंदा पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. असे असतानाही मात्र खरीपाचा हंगाम कसण्यासाठी शेतकरी ...

गोंदिया : यंदा पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. असे असतानाही मात्र खरीपाचा हंगाम कसण्यासाठी शेतकरी कंबर कसून शेतात उतरले होते. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत १०१ टक्के रोवण्या उरकल्या आहेत. कृषी अधिक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वसाधारण लागवड क्षेत्रा पेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त क्षेत्रात रोवणी झाली आहे. रोवणीची ही स्थिती उत्तम असताना पिकांवर मात्र अळी, करपा व खोडकिड्याचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचेही कळले. गारपिटीने रब्बीचा हंगाम कसा-बसा निघाल्याने शेतकरी दु:खी होता. त्यामुळे खरिपाचा हंगाम सर करायचाच अशी गाठ बांधून शेतकरी तयारीला लागला होता. मात्र मृग कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले. उशिरा आलेल्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम हाती घेतला. त्यातूनच नेहमीच्या तुलनेत उशिरा का होईना मात्र यंदा जिल्ह्यात १०१ टक्के रोवण्या झाल्याचे कृषी विभागाकडून कळले. जिल्ह्याचे १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्वसाधारण लागवड क्षेत्र आहे. यंदा मात्र जिल्ह्यात त्यापेक्षा दोन हजार ७६७ हेक्टर जास्त म्हणजेच एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील रोवणीची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास यात, गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ०५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात रोवण्या करण्यात आल्या आहेत. तर सध्या पाऊस येत असल्याने येत्या १५ दिवस पाऊस नाही आता तरी चालणार असून त्यानंतर मात्र पिकांवर परिणाम जाणवेल असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)