शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शेतीशास्त्र सर्व शास्त्रांची जननी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:45 IST

शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकरी व क्षेत्रीय कर्मचारी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शेतकऱ्यांनी पीक विमा केला पाहिजे, जसे मानवाला जीवन विम्याची गरज आहे. तशीच गरज पीक विम्याची आहे. शेतातील माती परीक्षण केल्याशिवाय खताची मात्रा देवू नये, शेत पिकावर आलेल्या किड व रोगांचे योग्य निदान करुनच किटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी. शेती शास्त्र हे सर्व शास्त्रांची जननी असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.शेतकरी व क्षेत्रिय कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम देवरी येथील मंगल कार्यालयात शनिवारी घेण्यात आला. देवरी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सडक- अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा या ४ तालुक्यातील कृषी सेवा केंद्र, शेतकरी मित्र व कर्मचारी, अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. माजी बालकल्याण सभापती सविता पुराम याच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, हिवरा कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विषतज्ज्ञ आर.डी. चव्हाण, धान संशोधन केंद्र साकोलीचे डॉ. जी.आर. शामकुवर, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी एस.व्ही.भोसले, मंडळ कृषी अधिकारी काशीनाथ मोहाळीकर, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी बाळासाहेब गिरी, तालुका कृषी अधिकारी लखन बन्सोड, डॉ. किशोर पात्रीकर, मंडळ अधिकारी चंद्रभान आकरे उपस्थित होते.डॉ.शामकुवर यांनी, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन खताची मात्रा द्यावी. ठोकळ धानापेक्षा बारीक धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्यास सांगितले. तोडसाम यांनी, कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना किडरोगाचा योग्य निदान लावूनच किटकनाशकाची मात्रा द्यावी, अवाजवी किटकनाशके देवू नये असे सांगितले.पुराम यांनी, कृषी मेळाव्यांमुळे कृषी केंद्र संचालकांना, शेतकऱ्यांना व कृषी मित्रांना किड व रोगाच्या व्यवस्थापनाची माहिती मिळाल्याने किड व रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सानिध्यात राहून किड व रोगाची माहिती जाणून घ्यावी. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे सांगितले.मेळाव्याला सडक-अर्जुनी, देवरी, आमगाव व सालेकसा येथील कृषी मित्र, कृषी सेवा केंद्र संचालक, महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. संचालन बन्सोड यांनी केले. आभार जी.जी. तोडसाम यांनी मानले.